AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मिळाली 32 कोटी 29 लाखांची नुकसान भरपाई

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. येवला, इगतपुरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावाली. त्यामुळे कांदा, गहू, मकासह इतर पीक जमीनदोस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Nashik | अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मिळाली 32 कोटी 29 लाखांची नुकसान भरपाई
नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Mar 12, 2022 | 12:49 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) अतिशय दिलासादायक बातमी. नाशिक जिल्ह्यात साधरणतः दीड वर्षापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस (Rain), अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 32 कोटी 29 लाखांची नुकसान भरपाई मदत प्राप्त झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट – सप्टेंबर 2021 मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त एकूण 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या तालुक्याला किती निधी?

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याला 15 कोटी 24 लाख, नांदगाव तालुक्याला 15 कोटी 74 लाख, देवळा तालुक्याला 83 हजार, सुरगाणा तालुक्याला 4 लक्ष 56 हजार, त्र्यंबकेश्वर तालुक्याला 95 हजार, इगतपुरी तालुक्याला 3 लाख 17 हजार, पेठ तालुक्याला 3 लाख 72 हजार तर निफाड तालुक्याला 1 कोटी 17 लाख रुपये असा एकूण नाशिक जिल्ह्यातील आठ नुकसानग्रस्त तालुक्यांना 32 कोटी 29 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सध्याही अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या अनेक गोरगरिब, कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुन्हा अवकाळी हजेरी

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. येवला, इगतपुरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावाली. त्यामुळे कांदा, गहू, मकासह इतर पीक जमीनदोस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. याची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

तालुकानिहाय निधी

येवला – 15 कोटी 24 लाख नांदगाव – 15 कोटी 74 लाख देवळा – 83 हजार सुरगाणा – 4 लक्ष 56 हजार त्र्यंबकेश्वर – 95 हजार इगतपुरी – 3 लाख 17 हजार पेठ – 3 लाख 72 निफाड – 1 कोटी 17 लाख एकूण – 32 कोटी 29 लाख

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

Follow Us
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?