AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मिळाली 32 कोटी 29 लाखांची नुकसान भरपाई

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. येवला, इगतपुरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावाली. त्यामुळे कांदा, गहू, मकासह इतर पीक जमीनदोस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Nashik | अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मिळाली 32 कोटी 29 लाखांची नुकसान भरपाई
नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
| Updated on: Mar 12, 2022 | 12:49 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) अतिशय दिलासादायक बातमी. नाशिक जिल्ह्यात साधरणतः दीड वर्षापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस (Rain), अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 32 कोटी 29 लाखांची नुकसान भरपाई मदत प्राप्त झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट – सप्टेंबर 2021 मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त एकूण 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या तालुक्याला किती निधी?

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याला 15 कोटी 24 लाख, नांदगाव तालुक्याला 15 कोटी 74 लाख, देवळा तालुक्याला 83 हजार, सुरगाणा तालुक्याला 4 लक्ष 56 हजार, त्र्यंबकेश्वर तालुक्याला 95 हजार, इगतपुरी तालुक्याला 3 लाख 17 हजार, पेठ तालुक्याला 3 लाख 72 हजार तर निफाड तालुक्याला 1 कोटी 17 लाख रुपये असा एकूण नाशिक जिल्ह्यातील आठ नुकसानग्रस्त तालुक्यांना 32 कोटी 29 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सध्याही अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या अनेक गोरगरिब, कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुन्हा अवकाळी हजेरी

नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. येवला, इगतपुरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावाली. त्यामुळे कांदा, गहू, मकासह इतर पीक जमीनदोस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. याची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

तालुकानिहाय निधी

येवला – 15 कोटी 24 लाख नांदगाव – 15 कोटी 74 लाख देवळा – 83 हजार सुरगाणा – 4 लक्ष 56 हजार त्र्यंबकेश्वर – 95 हजार इगतपुरी – 3 लाख 17 हजार पेठ – 3 लाख 72 निफाड – 1 कोटी 17 लाख एकूण – 32 कोटी 29 लाख

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.