AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | बेजबाबदार वागणाऱ्यांची खैर नाही, गर्दी पाहून अजित पवार भडकले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना लढ्याबाबत कडक पावलं (Ajit Pawar warns irresponsible people) उचलण्याचा इशारा दिला आहे.

Corona | बेजबाबदार वागणाऱ्यांची खैर नाही, गर्दी पाहून अजित पवार भडकले
| Updated on: Apr 01, 2020 | 1:57 PM
Share

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना लढ्याबाबत कडक पावलं (Ajit Pawar warns irresponsible people) उचलण्याचा इशारा दिला आहे. “इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घ्यावा; कोरोना लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर करणार नाही”, असं अजित पवार म्हणाले. गर्दी कमी होत नसल्याने, सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. (Ajit Pawar warns irresponsible people)

लोक भाजी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. मात्र त्यामुळे कोरोना अटोक्यात येणार नाही. इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असं अजित पवार म्हणाले.

इतकंच नाही तर बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजी खरेदीसाठी उसळणारी गर्दी चिंताजनक आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे, मात्र या गर्दीमुळे लॉकडाऊनचा उद्देशच धोक्यात आल्याचं अजित पवार म्हणाले.

बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल, बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला.

महाराष्ट्रात स्थिती काय?

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 320 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 167 वर गेला आहे. ‘कोरोना’मुळे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचलेला आहे. मुंबईतच आठ बळी गेले आहेत. (India Corona Patients Increase)

भारतात कोरोनाचा वाढता आकडा

भारतात गेल्या 16 दिवसांमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये 16 पट वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 16 दिवसात देशातील ‘कोरोनाग्रस्तां’चा आकडा 1600 च्या उंबरठ्यावर आहे. मंगळवार 31 मार्चला एका दिवसातच तब्बल 315 नवे रुग्ण आढळले. (India Corona Patients Increase)

एक मार्चपर्यंत भारतात केवळ तीन कोरोनाबाधित होते, तर 15 मार्चला हा आकडा 98 वर पोहोचला होता. म्हणजेच ही संख्या शंभरच्या आत होती. परंतु 31 मार्चला देशातील ‘कोरोनाग्रस्तां’ची संख्या 1618 वर गेली आहे. भारतात ‘कोरोना’च्या प्रसाराचा वेग या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या 

देशात ‘कोरोना’चे रुग्ण 16 दिवसात 16 पट, बारा तासात 240 कोरोनाग्रस्तांची वाढ

जवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा : अजित पवार

कोल्हापूरकरांची नेटकी तयारी, शिवाजी विद्यापीठाचं रुपांतर रुग्णालयात करण्यासाठी चाचपणी

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.