AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचूप

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नऊ तासांनंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली. ही घटना अत्यंत गंभीर असून हा चिंतेचा विषय असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली. मात्र, एरव्ही उठल्या-सुटल्या जगभरातील बहुतांश घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. ट्विटरवर नेहेमी प्रत्येक विषयावर आपलं मत मांडणाऱ्या […]

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचूप
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नऊ तासांनंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली. ही घटना अत्यंत गंभीर असून हा चिंतेचा विषय असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली. मात्र, एरव्ही उठल्या-सुटल्या जगभरातील बहुतांश घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ट्विटरवर नेहेमी प्रत्येक विषयावर आपलं मत मांडणाऱ्या इम्रान खान यांनी भारतीय जवानांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याबाबत मात्र एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वारंवार भारताला फुकटचे सल्ले देत असत, मात्र पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर इम्रान खान यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

पाकिस्तानकडून आलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “जगातील कुठल्याही कोपऱ्यात झालेल्या हिंसंक कारवाईचा पाकिस्तानने निषेधच केला आहे. कुठलाही तपास न करता भारतीय मीडिया आणि सरकारने हल्ल्याचा संबंध सरळ पाकिस्तानशी जोडला, हा आरोप आम्ही नाकारतो.”

दुसरीकडे, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध होतो आहे. पाकिस्तानवरही टीका केली जात आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांचे समर्थन करणे थांबवावे. तसेच, त्यांच्या देशातून या कारवाया पार पाडणाऱ्या दहशतवाद्यांचा आता खात्मा करावा अशी मागणी जगभरातून होत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ ​​वकासनं सुसाईड बॉमर बनून हा भ्याड हल्ला केला.

उरी हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला

उरीमध्ये (Uri Attack) सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हा हल्ला केला. हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

Pulwama Attack : पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

पाकिस्तानविरोधात एकत्र या, भारताचं जगाला जाहीर आवाहन

Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी

पुलवामा हल्ला हा मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक : जितेंद्र आव्हाड

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

पुलवामा हल्ला : भारत पुन्हा एकदा घरात घुसून मारणार?

Pulwama attack : शहिदांचा आकडा 44 वर पोहोचला

आमच्या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.