‘मन की बात’मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता रेडिओवर 'मन की बात' (Mann ki Baat) कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला (PM Narendra Modi appreciate work of swami samarth pharma producer company). 

'मन की बात'मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं कौतुक
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 3:49 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi)   यांनी आज (27 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता रेडिओवर ‘मन की बात’ (Mann ki Baat) कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं कौतुक केलं (PM Narendra Modi appreciate work of swami samarth pharma producer company).

“महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला, याचे उत्तम उदाहरण हे श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आहे. हा शेतकऱ्यांचा एक समूह आहे. पुणे-मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. या बाजारांमध्ये सुमारे 70 गावांमधील 4 हजार 500 शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते. ग्रामीण युवक या बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी होतात. रोजगार मिळवतात”, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

शेतकऱ्यांना संबोधित करताना मोदी काय म्हणाले?

“प्रिय देशवासियांनो, जो जमिनीशी एकरुप असतो, शेतीचं काम करतो त्याच्यात मोठ्या वादळांना झेलण्याची क्षमता असते, असं म्हटलं जातं. कोरोना संकटात आपले शेतकरी, कृषी क्षेत्र याचं जीवंत उदाहरण आहे. या संकट काळातही आपले शेतकरी शेतात राबत होते. आपले शेतकरी, कृषी क्षेत्र, गाव हे ‘आत्मनिर्भर भारत’चे आधार आहेत. हे आधार मजबूत झाले तर आत्मनिर्भर भारतची संकल्पना आणखी घट्ट होईल”, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

“मला अनेक शेतकऱ्यांचे पत्र येतात. शेतकरी संघटनांशीदेखील माझी चर्चा होते. शेतीतील बदल आणि नव्या आव्हानांविषयी ते माहिती देतात”, असं मोदींनी सांगितलं.

“गेल्या काही काळात कृषी क्षेत्रातील अनेक बंधनं तोडण्यात आले आहेत. हरियाणात 2014 साली फळ आणि भाज्यांना एपीएमसी अ‍ॅक्टमधून बाहेर काढण्यात आलं. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. शेतकरी शेतात पिकवलेले फळ, भाज्या कुठेही कुणालाही विकू शकतात. आता तसाच फायदा देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनाही होईल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले (PM Narendra Modi appreciate work of swami samarth pharma producer company).

संबंधित बातम्या : 

कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

कृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.