AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत.(PM Narendra Modi Mann ki Baat Live Update)

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा
| Updated on: Sep 27, 2020 | 9:22 AM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आज (27 सप्टेंबर) मन की बात (Mann ki Baat) या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविषयी बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरातील शेतकरी कृषी विधेयकाचा विरोध करत आहेत. त्यामुळे मोदी कृषी विधेयकावरुन देशवासियांना संबोधन करु शकतात. (PM Narendra Modi Mann ki Baat Live Update)

आज सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित होतो. आज प्रसारित होणार कार्यक्रम हा 69 वा असणार आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी त्यांच्या ट्विटरवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोना काळात मोदींनी सतत जनतेशी संवाद साधला आहे. आज ते नेमकं कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी विधेयक, शेती आणि शेतकरी या विषयांवर बोलण्याची शक्यता आहे. यासोबतच कोरोना महामारी आणि भारत-चीन सीमावादावरही मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे.

गेल्या मन की बात या कार्यक्रमातून आत्मनिर्भर भारत यावर चर्चा केली होती. आता सर्वांना लोकल टू व्होकल व्हावं लागणार आहे. भारतीय बाजारपेठा या चीनी खेळण्याच्या वस्तूंनी व्यापल्या आहेत. त्यामुळे देशवासियांना मिळून काही नवीन खेळाचे प्रकार बनवले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.

कृषी विधेयकाला विरोध का?

कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचं सांगून रद्द करण्याची मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची आहे. दुसरीकडे भाजपने कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्याच बाजूनं असल्याचा दावा केलाय. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना देशात कोणत्याही राज्यात शेतमाल विकता येणार आहे. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या चक्रातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदीदारासोबत 5 वर्षांसाठी शेतमालाचा करार करता येणार आहे. शेतकरी बंधनमुक्त होईल आणि कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल. पण यामुळे शेतीमालाला MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत मिळणार नसल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. (PM Narendra Modi Mann ki Baat Live Update)

संबंधित बातम्या : 

कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

कृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.