AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रोच्या कामगिरीवर देशाला अभिमान : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामाचं कौतुक केलं (Republic Day 2020).

इस्रोच्या कामगिरीवर देशाला अभिमान : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
| Updated on: Jan 26, 2020 | 8:23 AM
Share

नवी दिल्ली : देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामाचं कौतुक केलं (Republic Day 2020). “भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) कामगिरीवर संपूर्ण देशाला अभिमान आहे. इस्रोची टीम सध्या ‘मिशन गगनयान’ची पूर्ण तयारी करत आहे. तसेच, संपूर्ण देश ‘भारतीय मानव अवकाश यान कार्यक्रमाची प्रतिक्षा करत आहे”, असं रामनाथ कोविंद म्हणाले (President Ramnath Kovind).

“देशाच्या विकासासाठी एक सशक्त अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारने देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणखी मजबूत बनवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत (President Ramnath Kovind).”

“देशातील सेना, निमलष्करी दलं आणि अंतर्गत सुरक्षा दल यांची मी स्तुती करतो. देशातील एकता, अखंडता आणि सुरक्षेला अबाधित ठेवण्यासाठी त्यांचं बलिदान शौर्य आणि शिस्तीची अमर कथा सांगणारे आहे. आपले शेतकरी, डॉक्टर्स आणि परिचारिका, शिक्षण आणि संस्कार देणारे शिक्षक, वैज्ञानिक आणि इंजिनिअर्स, सतर्क आणि सक्रिय तरुण, अथक परिश्रम करुन आपले कारखाने चालवणारे आपले कामगार बांधव देशाचे गौरव आहेत.”

“कुठल्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना विशेषकरुन तरुणांना गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा कधी विसर पडू नये. गांधीजींचा अहिंसेचा मार्ग हा मानवतेसाठी अमूल्य भेट आहे.”, असं राष्ट्रपती म्हणाले.

“प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात विदेशी राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याची आपली परंपरा आहे. मला आनंद आहे की यावर्षीही रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

“आजपासून सात दशतकांपूर्वी 26 जानेवारीला आपलं संविधान लागू झालं. त्यापूर्वीच या तारखेचं विशेष महत्त्व प्रस्थापित झालं होतं. ‘पूर्ण स्वराज्य’चा संकल्प घेतल्यानंतर देशवासी 1930 ते 1947 पर्यंत प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला ‘पूर्ण स्वराज्य दिन’ साजरा केला जायचा. त्यामुळे 1950 पासून त्याच ऐतिहासिक दिवशी भारताच्या लोकांनी संविधानप्रती आपली श्रद्धा व्यक्त करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात केली”, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नमुद केलं.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.