AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरुन चालणार का? : राधाकृष्ण विखे पाटील

"शेतकरी आणि जनतेची चिंता न करता नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री मुंबईत जावून बसलेत", असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला (Radhakrishna Vikhe patil slams CM Uddhav Thackeray).

मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरुन चालणार का? : राधाकृष्ण विखे पाटील
| Updated on: May 19, 2020 | 9:35 PM
Share

अहमदनगर : “कोरोनाच्या संकंटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार (Radhakrishna Vikhe patil slams CM Uddhav Thackeray) अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का?”, असा खोचक सवाल भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe patil slams CM Uddhav Thackeray) यांनी केला आहे.

“केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही”, असा गंभीर आरोप विखे पाटलांनी केला. भाजपतर्फे आज (19 मे) राज्यभरात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात आलं. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून विखे पाटलांनी तहसीलदारांना निवेदन दिलं. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

“शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. दुधाला सरसकट पाच रुपये अनुदान द्यावं, शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक पॅकेज जाहीर करावं”, अशी मागणी विखे पाटलांनी केली.

“शेतकरी आणि जनतेची चिंता न करता नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री मुंबईत जावून बसलेत”, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि राज्यमंत्री प्रसाद तनपुरे यांना लगावला.

“परप्रांतिय कामगारांसाठी उपाययोजना नाहीत. मजुरांची जीवघेणी पायपीट सुरु आहे. मात्र त्यांची कोणतीही काळजी सरकारला नाही. राज्याच्या विकासात परप्रांतियांचादेखील वाटा आहे. मात्र राज्य सरकारकडून त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही”, अशी टीका विखे पाटलांनी केली.

“वाधवानचा बागबान कोण? या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र अमिताभ गुप्तांना क्लिनचिट दिली गेली”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.