AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महान संत शरदचंद्रजी पवार… राज ठाकरे यांची खोचक टीका काय?

राज्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. राज ठाकरे यांचा विदर्भात दौरा सुरु असून त्यांची आज लातूर येथे सभा झाली. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचे आसूड ओढले आहेत.

महान संत शरदचंद्रजी पवार... राज ठाकरे यांची खोचक टीका काय?
| Updated on: Nov 06, 2024 | 1:41 PM
Share

राज्यात निवडणूकांचा प्रचाराला वेग आला आहे. राज ठाकरे यांचा विदर्भाचा दौरा सुरु आहे.राज ठाकरे यांनी लातूर येथे झालेल्या भाषणात शरद पवार यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणावरुन आणि समाजा-समाजात सुरु असलेल्या जातीय राज कारणावरुन राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरु झाल्याची टीका यावेळी राज ठाकरे यानी केली आहे.

राज ठाकरे यावेळी म्हणाले की मराठा समाजाने आतापर्यंत अनेक मार्चे अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत काढले होते. त्यानंतर मराठा समाजाचे मनोज जरांगे यांचे मोर्चे आंदोलन सुरु झाले.जरांगे पाटील मुंबईत मोर्चे घेऊन आले. शिंदे म्हणाले जा दिले आरक्षण. म्हणजे काय. तुमच्या हातात तरी आहे का? तामिळनाडूतही असं झालं. त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं. तामिळनाडूचा हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांना काही मिळाले नाही. जी गोष्ट घडू शकत नाही. होऊ शकत नाही, त्यासाठी आम्ही भांडत आहोत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरे यांनी यावेळी भाषणात सांगितले की १९९९ साली राष्ट्रवादीचा जन्म झाला. तो जन्म झाल्यावर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं आता धर्म आणि हिंदुत्वाच्या गोष्टी छाटायच्या कशा. लोकांना बाहेर कसं आणायचं. मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून जातीचं राजकारण सुरू झालं असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की प्रत्येकाला जातीचा अभिमान असतो. जातीबद्दल प्रेम असणं वावगं नाही. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे चुकीचं आहे. नेमक्या याच गोष्टी या लोकांनी केल्या आणि तुमची माथी भडकावली असेही राज ठाकरे म्हणाले

रोज आत्महत्येचे आकडे वाढत आहे.

आपण मूळ विषयाकडे जायला तयार नाही. शेतकरी आत्महत्या करतो कुणाचं लक्ष नाही. रोज आत्महत्येचे आकडे वाढत आहे. कुणाचं लक्ष नाही. तरुण शेती सोडून शहरात जातो. कुणाचं लक्ष नाही. कृषी विद्यापीठ ओस पडले आहे. त्याकडे कुणाचं लक्ष नाही. इतके तरुण – तरुणी आणि महिलांचे प्रश्न आहे. मराठवाड्यातील आकडे पाहा, मराठवाड्यात सर्वाधिक प्रमाण महिलांना पळवून नेण्याचं आहे. मी त्या दिवशी आकडे वाचून दाखवलं. राज्यात लहान मुलींवरील बलात्काराचं प्रमाण वाढलं आहे. तरुण मुली आणि महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढले आहे. असा नव्हता महाराष्ट्र कधी, मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न आहे. विहिरीला पाणी लागत नाही.कुठून शेती करणार आहे. कोणत्याही गोष्टीकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून यासाठी म्हणून जातीपातीचा विषय तुमच्यासमोर आला आहे. भांडा, बसा वाद घालत, बसा द्वेष पसरवत. त्यातून कोणाच्याही काही हाताला लागणार नाही. मूळ विषयाला लक्ष न दिल्याने त्यातून काही हाती लागणार नाही असेही राज ठाकर यावेळी म्हणाले.

Follow Us
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.