AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद हमारा था, हमारा है, हमारा रहेगा, अकबरुद्दीन ओवैसी यांचे संभाजीनगरात प्रतिपादन

इथे सर्वांच्या जातीचे आवाज आहेत, फक्त मुस्लिमांचे आवाज नाहीये. मी इथे आलोय की आपण जिवंत आहोत हे सांगायला आलो आहे. तुम्ही उठा एकत्र व्हा नाहीतर तुमची कौम धोक्यात आहे असेही अकबरुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले.

औरंगाबाद हमारा था, हमारा है, हमारा रहेगा, अकबरुद्दीन ओवैसी यांचे संभाजीनगरात  प्रतिपादन
| Updated on: Nov 06, 2024 | 1:47 PM
Share

एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची संभाजीनगरात जाहीर प्रचारसभा झाली.या सभेत त्यांनी भाजपा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की मी दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रात तुम्हाला शेर बनविण्यासाठी आलो होतो. हा देश जेवढा तिलक लावणाऱ्यांचा आहे तेवढा दाढीवाल्यांचा आहे. दहा वर्षांपूर्वी मी तुम्हाला एकत्र करायचा प्रयत्न केला. तुम्हाला एकत्र करण्यासाठी मी शेरवाणाचा तुकडा पसरुन भीक मागितली होती. तुम्हाला शेर बनायचं असेल तर अत्याचाऱ्यांच्या विरोधात आवाज बुलंद करा.दहा वर्षांनंतर मी तुम्हाला आठवण करुन द्यायला आलो आहे. त्यावेळी कुणीही आमदार खासदार नव्हते, पण आमदार खासदार झाले, मी ते तुमच्या हातात दिले आणि त्यांनी महाराष्ट्रात ही ताकत पुढे नेली आहे. यश मिळाल्यास तुम्हाला खुर्ची देईन, मी तिथे खाली बसेन असेही अकबरुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले.

आज दोन एनसीपी आणि दोन सेना आहेत, पहा किती पार्ट्या झाल्या आहेत. शिवसेना आणि भाजप हिंदुत्व सांगणारे पक्ष आहेत, पण शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. उद्धव ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले आहेत.उध्दव ठाकरे जी राहुल आणि प्रियांकाला हिंदुत्व शिकवण्यात यशस्वी झाले का ? वा राहुलआणि प्रियांकांना ठाकरेना शिकवण्यात यश आलं का ? अजित पवारांनी शिंदेचा आदर्श घेतला की शिंदेंनी अजित पवारांना आदर्श दिला की अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा आदर्श मोदी आणि योगींना दिला का ? असा सवाल यावेळी अकबरुद्दीन ओवैसी यांनी केला.

तुमची कृती देशाला कमजोर करत नाहीत का ?

एमआयएम मुस्लिम दलित मराठा समाजाची आवाज बनत आहे. मी कलमा पडणेवाला मुस्लिम आहे, पण मला हिंदुस्थानी असण्याचा अभिमान आहे.मी मुस्लिम आहे, मुस्लिमांच्या हक्काची लढाई लढत असतो. योगी म्हणतात बटोगे तो कटोगे, बीफच्या नावावर दाढी वाढवणाऱ्यांना तुम्ही कापत आहेत, ही तुमची कृती देशाला कमजोर करत नाहीत का ? हिंदू मुस्लिमांना लढवून देशाला तुम्ही कमजोर करत नाहीत का.? नरेंद्र मोदी हा हिंदुस्थान तुझा जेवढा आहे, तेवढा माझा पण आहे, हा देश कुणा एकाचा नाही असेही ओवैसी यावेळी म्हणाले. देशात बेरोजगारी, महागाई, बलात्कार हे खरे प्रश्न आहेत, पण त्यावर काहीच होत नाही देशात. फक्त धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट टाकण्याचे काम सुरु असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

जातीचं राजकारण करू नका असं तुम्ही सांगता, मग तुम्ही हे का सांगत नाहीत की धर्माचं राजकारण करू नका.मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आम्ही कायम तुमच्यासोबत राहू.इथे दलित मुस्लिमांवर अत्याचार होत असतात, मराठा- दलित- मुस्लिम एकत्र येऊन अत्याचाऱ्याच्या विरोधात लढूया असे आवाहन यावेळी ओवैसी यांनी केले. मी जरांगे पाटलांना सांगू इच्छितो फक्त मराठा समाज मागास नाहीय तर संपूर्ण मराठवाडाच मागास आहे .मुंबई पुणे नागपूर पेक्षा मराठवाडा मागास आहे.मराठा अरक्षणासोबत मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न करूया, 30 वर्ष झाले मराठवाडा विकास महामंडळ बनवले, पण ते कागदावर आहे, पैसाच दिलाच नाही, त्यामुळे अरक्षणासोबत मराठवाडा विकास महामंडलाला 50 हजार कोटी रुपयांची मागणी करूयात असेही ते यावेळी म्हणाले.

पाणी आणि नोकऱ्या हव्यात

औरंगाबाद संभाजीनगर नाव बदललं. पण नाव बदलल्यामुळे मराठवाड्यातील प्रश्न सुटणार आहेत का, अरे बेइमानानो काम करा काम.नीती आयोगाच्या अहवालात मराठवाडा सर्वात मागास असल्याचा अहवाल आला आहे.चला मराठ्यांचा साथ सोबत घेऊन मराठवाड्याच्या विकासासाठी लढूयात. मराठा मुख्यमंत्री, मंत्री नको..पण मराठवाड्यात पाणी आणि नौकऱ्या हव्या आहेत, मराठवाड्याला हक्क हवा आहे.शरद पवार ही हमी देणार का? की निवडणुकीनंतर मोदी सोबत जाणार नाहीत ?अजित पवार शिंदे उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर कशावरुन पलटी मारणार नाहीत ? असा सवाल अकबरुद्दीन ओवैसी यांनी केला.

औरंगाबाद हमारा था हमारा है हमारा रहेगा

आपल्याला भाजप, अजित पवार आणि शिंदे सेना यांना हरवायचं आहे.ज्या जातीकडे जोश आहे आणि होश नाही ती जात यशस्वी होत नाही. वेळ कठीण आहे, मला तुमची साथ हवी आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी कौमला कमजोर करू नका. आमच्या परवानगी शिवाय कुणीही सरकार बनवू शकणार नाही. योगी आणेवाला आहे तेरे बाद अकबर भी आणेवाला है, मोदी भी आणेवाला है तेरे बाद अकबर आयेगा…20 तारखेला आकाशात फक्त पतंग दिसेल. औरंगाबाद हमारा था हमारा है हमारा रहेगा असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले.

Follow Us
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिवसांवरच आली असता...
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ