AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या राज्यात सर्वाधिक एलपीजीचे ग्राहक, PMUY योजनेचा लाभ नेमका किती जणांना ?

LPG Consumers India: इराण, इस्राईल आणि अमेरिका दरम्यान चालू असलेल्या तणावाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत आहे. चला तर भारतातील कोणता राज्यात सर्वात जास्त एलपीजीचा वापर होतो ते पाहूयात...

कोणत्या राज्यात सर्वाधिक एलपीजीचे ग्राहक, PMUY योजनेचा लाभ नेमका किती जणांना ?
LPG Consumers India
| Updated on: Mar 16, 2026 | 8:28 PM
Share

इराण आणि इस्राईल-US युद्धाच्या तणावामुळे संपूर्ण जगभरात ऊर्जासंकट निर्माण झाल आहे. होर्मेुज स्ट्रेट हा समुद्री मार्ग इराणने बंद केल्याने आता इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतात अनेक भागात एलपीजी सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी हॉटेल चालकांना पुन्हा चुलींवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. तर काही कुटुंबात इंडक्शन कुकटॉपचा वापर करुन सिलिंडर टंचाईवर मात केली जात आहे. अशात आपण आज पाहूयात भारताच्या कोणत्या राज्यात एलपीजी वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा किती जण लाभ घेत आहेत ?

एलपीजी वापर करणाऱ्यांची संख्या

उत्तर प्रदेशात एलपीजी वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एकट्या उत्तर प्रदेशातच सुमारे ४.८७ कोटी एलपीजीचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या आहे. ही देशाच्या एकूण घरगुती एलपीजीचा वापर करणाऱ्या लोकांच्या सुमारे १५ टक्के आहे. मोठी लोकसंख्या आणि गावातील वापर यामुळे एलपीजीचा वापर करण्यात उत्तर प्रदेश सर्वात पुढे आहे.

भारतात एलपीजीचा वापर करणारे लोक

भारतात ३३.३७ ते ३४ कोटी सक्रीय घरगुती एलपीजीचा वापर करणारे लोक आहेत. गेल्या १० वर्षात सरकारी योजना आणि पुरवठ्याचे वाढलेल्या नेटवर्कमुळे  शहर आणि गावातील स्वयंपाकासाठी गॅसचा वापर वाढला आहे, या विस्तारामुळे लाकूड, कोळसा आणि केरोसिनसारख्या पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी झाले आहे.

एलपीजीचा वापर करण्यात दुसरी राज्ये

उत्तर प्रदेशानंतर अन्य राज्यातही एलपीजीचा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात सुमारे ३.०२ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुमारे २.७२ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात. तामिळनाडूत सुमारे २.४ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात. बिहारात सुमारे २.३३ कोटी लोक एलपीजीचा वापर करतात.

पंतप्रधान उज्ज्वला योजना

पंतप्रधान उज्ज्वला योजना आर्थिक रुपाने कमजोर कुटुंबियासाठी स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पोहचवण्यात महत्वाची मोठी भूमिका बजावत आहे. ही योजना गरीब कुटुंबासाठी महिलांना एलपीजी कनेक्शन देते. आतापर्यंत या योजनेंतर्गत संपूर्ण देशात एकूण १०.५६ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत.

उज्ज्वला योजनेची सर्वात जास्त लाभार्थी राज्ये

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांत उत्तर प्रदेश पुन्हा एकदा या यादीत सर्वात पुढे आहे. या राज्यात सुमारे १.८८ कोटी कुटुंबियांना या योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शन मिळतात. यानंतर पश्चिम बंगालचा नंबर आहे.पश्चिम बंगालमध्ये १.२४ कोटी लाभार्थी आहेत. यानंतर बिहारात सुमारे १.१८ कोटी कुटुंबियांना या योजनंतर्गत लाभ मिळतो.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!