AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 255 जवान शहीद झाले असून प्रत्येक जवानाच्या नावाने एक झाड ही संकल्पना राबवण्याची संकल्पना सयाजी शिंदे यांनी मांडली आहे

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 29, 2020 | 4:13 PM
Share

सातारा : प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय जवान जय किसान’ ही नवीन संकल्पना राबवली आहे. साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली द्या, अशा उत्कट भावना यावेळी सयाजींनी बोलून दाखवल्या. (Sayaji Shinde Tree plantation in Satara for Martyr Soldiers)

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा उद्देश समोर ठेवून दुष्काळी माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय जवान जय किसान’ ही नवीन संकल्पना आणली आहे,

सयाजी यांनी आज वडगाव दडसवाडा या ठिकाणी शहीद जवानांचे कुटुंबिय आणि ग्रामस्थ यांच्यासोबत दुष्काळी भागातील माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. यामध्ये जांभूळ, चिंच, आवळा यांची सुमारे एक हजार पाचशे झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला.

सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रुत आहे. राज्यात ठिकठिकाणी त्यांनी आतापर्यंत वृक्षारोपण केले आहे. त्याचप्रमाणे सैनिकांसाठीची त्यांची तळमळही वारंवार व्यक्त होत असते.

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 255 जवान शहीद झाले असून प्रत्येक जवानाच्या नावाने एक झाड ही संकल्पना राबवण्याची संकल्पना सयाजी शिंदे यांनी मांडली आहे. माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी याआधीही दुष्काळी भागात हजारो झाडे लावली आहेत.

शहीद जवानांच्या कुटुंबाकडून लावण्यात येणारे प्रत्येक झाड हे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक जवानाची स्मृती जागृत करुन देणारे असल्याच्या भावना सयाजी शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्या.

देशातील पहिलं वृक्ष संमेलन सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यात आयोजित केले होते. विशेष म्हणजे या संमेलनाच्या अध्यक्षपदी वडाचे झाड होते. या संमेलनात सयाजी शिंदेनीही उपस्थितांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला होता. (Sayaji Shinde Tree plantation in Satara for Martyr Soldiers)

संबंधित बातम्या 

सयाजी शिंदेंकडून स्वत: आगीत उतरुन वणवा विझवण्याचा प्रयत्न

वृक्षलागवड थोतांड आहे असं म्हणणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा, सुधीर मुनगंटीवारांचे सयाजी शिंदेंना उत्तर

(Sayaji Shinde Tree plantation in Satara for Martyr Soldiers)

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?