AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे कोणत्या खुर्चीवर, याला महत्त्व राहिलेलं नाही…; शहाजीबापूंच्या विधानाने भुवया उंचावल्या

Shahajibapu Patil on DCM Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्याबाबतही मोठं विधान केलं आहे. शहाजीबापू पाटील यांनी नेमकं काय म्हटलं आहे? वाचा सविस्तर...

एकनाथ शिंदे कोणत्या खुर्चीवर, याला महत्त्व राहिलेलं नाही...; शहाजीबापूंच्या विधानाने भुवया उंचावल्या
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
| Updated on: Dec 13, 2024 | 2:06 PM
Share

2022 बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतू आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 132 जागा निवडून आल्या. त्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाष्य केलं आहे. भाजपच्या आमदारांच्या रेट्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतू एकनाथ शिंदे हे आता कोणत्या खुर्चीवर आहेत याला इतिहासात महत्त्व राहिलेलं नाही. जनतेच्या मनावर राज्य करणारे ते लोकनेते आहेत, असं शहाजीबापू म्हणालेत.

संजय राऊतांवर निशाणा

बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यानंतर मतमोजणी दिवशी विरोधक देश सोडून पळून जातील, असं संजय राऊत आज सकाळी बोलताना म्हणाले. त्यावर शहाजीबापूंनी प्रतिक्रिया दिली आहे. बॅलन्स पेपरवर घ्या. ईव्हीएम मशीनवर निवडणुका घ्या. अजून कुठलेही संशोधन करा. परंतु संजय राऊत तुमचं काल घर भुई सपाट झालेला आहे. त्यातील पत्र विटा काही चांगले असतील तर गोळा करा आणि तुमचं झोपडं बांधा. या संजय राऊतांनी शिवसेनेचे तुकडे करून टाकले. आता उरली सुरली ठाकरेंच्या शिवसेनेचे वाटोळं केल्याशिवाय तो काय आता गप्प बसत नाही, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

शहाजीबापू पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पाच खासदार अजित पवार यांनी फोडून आणल्यावरच केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळणार. अशी ऑफर भाजपने अजितदादांना दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शहाजीबापू पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हा संध्याकाळी वेगवेगळी दिवा स्वप्न पाहणारा माणूस आहे. जे स्वप्न संध्याकाळी पाहतो ते सकाळी टीव्ही समोर सांगण्याची सवय आहे. अजितदादांना अशी भाजपने कोणतीही अट घातलेली नाही, हे मी खात्रीने सांगतो, असं पाटलांनी म्हटलं आहे.

विधानसभेला झालेल्या दारुण पराभवामुळे विरोधकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. घराबाहेर पडून राजकारणात पुन्हा कसे यायचे यासाठी हा शोधलेला मार्ग म्हणजे ईव्हीएमवरती आक्षेप असल्याचा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. तर पक्ष वाढीसाठी एकनाथ शिंदे साहेब पक्ष पातळीवर किंवा शासकीय पातळीवर मला मोठी जबाबदारी देतील. ते काम मी चांगल्या पद्धतीने पार पाडेल आणि दिलेल्या संधीचं सोनं करेल, असंही त्यांनी म्हटलंय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.