VIDEO : विदारक वास्तव ! वृद्धेला प्रचंड ताप, हतबल नातेवाईकांनी रुग्णालयात नेण्यासाठी ओढ्याच्या पाण्यातून चालवत नेलं

जिंतूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. मात्र दहेगाव येथे पूल नसलेल्या ओढ्याला पूर आल्यामुळे आजारी महिलेस उपचारासाठी चक्क कंबरेएवढ्या पाण्यातून चालवत न्यावे लागले.

VIDEO : विदारक वास्तव ! वृद्धेला प्रचंड ताप, हतबल नातेवाईकांनी रुग्णालयात नेण्यासाठी ओढ्याच्या पाण्यातून चालवत नेलं
मन पिळवटून टाकणारं वास्तव, वृद्धेला रुग्णालयात नेण्यासाठी ओढ्याच्या पाण्यातून चालवत नेण्याची वेळ
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 3:29 PM

परभणी : राज्यात विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका राहिल्या की नेतेमंडळींकडून आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पडतो. पण एकदा निवडणूक झाली की त्याच नेत्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडतो. नेतेमंडळींकडून सर्वसामान्यांना चांगले रस्ते, एका गावाला दुसऱ्या गावाशी जोडणारा पूल यांची फक्त दिवा स्वप्न दाखवले जाते. पण या स्वप्नांची पूर्तता केली जात नाही. नागरिकांना मुलभूत नागरी सुविधाही दिल्या जात नाहीत. त्याचाच फटका आज जिंतूरमधील एका कुटुंबाला बसला आहे. जिंतूरच्या दहेगाव येथील एका आजारी वृद्धेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तिच्या कुटुबियांना ओढ्याच्या डोक्याभर पाण्यातून चालवून रुग्णालयात नेले. या घटनेची संपूर्ण जिंतूर तालुक्यात चर्चा सुरु आहे.

थोडाफार पाऊस पडला तरी रस्ते बंद

जिंतूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. मात्र दहेगाव येथे पूल नसलेल्या ओढ्याला पूर आल्यामुळे आजारी महिलेस उपचारासाठी चक्क कंबरेएवढ्या पाण्यातून चालवत न्यावे लागले. जिंतूर तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य बघायला मिळतंय. तर काही गावांना जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. शिवाय छोटे ओढे, नाल्यांवर पूल नाहीत. त्यामुळे थोडाफार पाऊस पडला तर रस्ते बंद होतात. यामुळे काही गावांचा संपर्क तुटतो. असाच प्रकार जिंतूर तालुक्यातील दहेगाव गावात बघायला मिळाला. पूल नसल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वयोवृद्ध महिलेची प्रकृती गंभीर

गावातील वयोवृद्ध महिला हरिबाई ढोणे यांना 21 जुलैला प्रचंड ताप आला होता. मात्र, त्याचवेळी गावाबाहेर असलेल्या ओढ्याला प्रचंड पूर आलेला होता. हरिबाई यांना तालुक्यातील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणं जास्त जरुरीचं होतं. पण ओढ्याला इतका पूर आला होता की थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. हरिबाई यांच्या नातेवाईकांनी ओढ्याचे पाणी कमी होईल म्हणून काही काळ वाट बघितली. पण ताप वाढत असल्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर होऊ लागली.

अखेर महिलेला ओढ्याच्या पाण्यातून चालत नेलं

अखेर हरिबाई यांचे नातेवाईक दिलीप ढोणे, संतोष ढोणे यांनी ओढ्याच्या पाण्यातून महिलेला दवाखान्यात नेण्याचं ठरवलं. त्यानुसार हरिबाई यांच्या नातेवाईकांनी गुडघ्याएवढ्या पाण्यातून महिलेला दवाखान्यातून नेलं. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. दरम्यान गेल्या 20 ते 25 वर्षांपासून दहेगाव येथील नागरिक पूल मिळावा मागणी करूनही राजकीय नेते आणि प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

चिपळूणमध्ये पावसाचा हाहा:कार; 7 बोटींद्वारे बचावकार्य सुरु, आतापर्यंत 75 लोक सुरक्षितस्थळी- अनिल परब 

बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस, उल्हास नदीला पूर, बाजारपेठेला फटका, दुकानांत पाणी घुसलं!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.