AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विचार स्वातंत्र्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय; पृथ्वीराज चव्हाणांचा गोखलेंना टोला

विक्रम गोखले हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांना सांगा कि, राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मत घ्या. तसेच स्वतः मुख्यमंत्री व्हावे, याचा मलाही आनंद वाटेल. विचार स्वातंत्र्य असल्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय झाली आहे. अशा लोकांना राजाश्रय मिळतो ही दुर्दैवी बाब आहे. अशी विधानं करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा गंध नाही, कुणी कुणी काय काय केलं, किती परिश्रमाने हे स्वातंत्र्य मिळालं हेच त्यांना माहीत नाही

विचार स्वातंत्र्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय; पृथ्वीराज चव्हाणांचा गोखलेंना टोला
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 6:17 PM
Share

पुणे – अभिनेते विक्रम गोखल्याच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी शिवसेना – भाजपने एकत्र यांनी सर्वकाही विसरून पुन्हा एकत्र यावे अशी भावनाही व्यक्त केली आहे. इतकच नव्हे तर कंगना राणावने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचेही गोखलेंनी समर्थन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं गोखल्याच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गोखलेंनी ही वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी गोखलेंना उत्तर दिले आहे.

राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा

”विक्रम गोखले हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांना सांगा कि, राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मत घ्या. तसेच स्वतः मुख्यमंत्री व्हावे, याचा मलाही आनंद वाटेल.”

”विचार स्वातंत्र्य असल्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय झाली आहे. अशा लोकांना राजाश्रय मिळतो ही दुर्दैवी बाब आहे. अशी विधानं करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा गंध नाही, कुणी कुणी काय काय केलं, किती परिश्रमाने हे स्वातंत्र्य मिळालं हेच त्यांना माहीत नाही. रक्तरंजित क्रांती झाली नाही हेच या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.” अशी विधाने करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडूनही गौरवले जाते, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

या प्रकारचे वक्तव्य करणे हा सैनिकाचा अपमान ज्या लोकांनी आपले बलिदान दिले, ज्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास भोगला, लाठ्या खाल्ल्या अशा सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे. व्यक्तिस्वातंत्र्य असल्यामुळे अशी विधाने केली जातात . परंतु अशा व्यक्तीला शासनाकडूनही गौरवले जाते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या शब्दात त्यांनी कंगना राणावतचा खरपूस समाचार घेतला. अशा प्रकारची विधानं करण्यासाठीची मानसिकता भारतीय जनता पक्षाकडून पसरवली जात आहे. असेही ते म्हणाले.

समाजात दुही निर्माण करणाऱ्यांचा शोध घ्या हिंदुत्व हि पॉलिटिकल फॅसिस्ट फिलॉसॉफी आहे..या तत्वज्ञानाबद्दल अशा प्रकारची लोक समोर येऊन समाजात दुही निर्माण करण्याचा , फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत कधीही स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिकेबद्दल अनादर करणारे उद्गार काढले नव्हते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे अशा लोकांना प्रोत्साहन कोण देतो याचा शोध घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले

हेही वाचा:

शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.