AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचा हिंदमहासागरात भारताविरोधात नवा कट, भारताकडूनही चोख उत्तर

जगातील तिसऱ्या मोठ्या महासागरात म्हणजे हिंदमहासागरात चीन भारताविरोधात नवा कट रचत आहे. (India China Sea War and Pakistan).

चीनचा हिंदमहासागरात भारताविरोधात नवा कट, भारताकडूनही चोख उत्तर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 16, 2020 | 6:58 PM
Share

मुंबई : जगातील तिसरा मोठा महासागर म्हणजे हिंदमहासागर. 70 लाख 56 हजार किलोमीटर लांब असलेल्या याच हिंदमहासागरात चीन भारताविरोधात नवा कट शिजवतोय (India China Sea War and Pakistan). चीनच्या या कटाची खलबतं थेट पाकिस्तानच्या ग्वादर आणि कराची बंदरात सुरु आहेत. या दोन्ही बंदरांवरुनच चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात दुहेरी युद्ध छेडण्याच्या विचारात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

जमिनीवर भारतीय जवानांनी चिनी ड्रॅगनचे दात त्यांच्याच घशात घातले. त्यामुळे लडाखमध्ये चर्चेचं सोंग आणून चीननं पाण्याद्वारे डिवचण्याची कारस्थानं सुरु केली आहेत. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल खेळलीय. त्यामुळे समुद्रात चीनला पाकिस्तानच्या बंदराचं बळ मिळणार आहे, असं मत संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

चीनला समुद्रात मर्यादा आहेत. समुद्रातील युद्धात संख्याबळापेक्षा भौगोलिक रचनेला जास्त महत्व असतं. या दोन्ही गोष्टींमध्ये भारतीय नौदल चीनपेक्षा सरस मानलं जातं. समुद्रात एकट्याच्या जीवावर भारताविरोधात लढणं चीनला परवडणार नाही. म्हणून पाकिस्तानला हाताशी धरुन अरबी समुद्रात चिनी सरकारनं नेव्ही बेसची शोधाशोध सुरु केलीय. याआधीपासून पाकिस्तानच्या ग्वादर आणि कराचीत चीनचे बेस आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

2017 मध्ये चीननं आफ्रिका खंडातील जिबुतीमध्ये पहिला हायटेक बेस बनवला होता. तसाच हायटेक बेस चीनला हिंद महासागरातील IOR मध्ये बनवायचा आहे. IOR हा पाकिस्तानचं ग्वादर आणि कराची बंदर यांच्या अत्यंत जवळचा भाग आहे. या ठिकाणामुळे चीनी पाणबुड्या आणि जहाजांना भारताजवळ येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, चीनच्या या चालबाजीवर भारताकडेही चोख उत्तर आहे.

आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये चिनी वस्तू या दक्षिण चिनी समुद्रातून पोहोचतात. भारतानं जर मनात घेतलं, तर मलाका स्ट्रेटद्वारे भारत या मार्गात अनेक अडथळे आणू शकतो. मात्र, फक्त आत्ताच नाही, तर भविष्यात सुद्धा भारताला सतर्क राहावं लागणार आहे. कारण, चीन-पाकिस्तानात होत असलेले करार हे पुढच्या काळात भारताबाबत चिंतेचे विषय ठरु शकतात.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

चीन 2021 पर्यंत पाकिस्तानला आधुनिक पाणबुड्या देणार आहे. चीन-पाकिस्तानमध्ये 7 बिलियन डॉलरचा करार सुद्धा झालाय. पाकिस्तानच्या नौदलाला चीन आधुनिक शस्रं सुद्धा देणार आहे. आजही पाकिस्तानी सैन्याकडील एकूण शस्रांपैकी 70 टक्के शस्रं ही चीनची आहेत. आता चीन आणि पाकिस्तानच्या युतीवर भारत कशी मात करणार हे सुद्धा महत्वाचं आहे. भारतीय नौदल हे जगातलं चौथं मोठं नौदल आहे. तर पाकिस्तानी नौदलाचा जगात 13 वा क्रमांक लागतो.

भारतीय नौदलाकडे एकूण 295 आधुनिक जहाजं आहेत. तर पाकिस्तानच्या ताफ्यात एकूण 197 जहाजं आहेत. भारताकडे गस्त घालणारी जहाजांची संख्या 139 आहे. तर पाकिस्तानकडे फक्त 17 गस्त घालणारे जहाजं आहेत. यावरुन पाकिस्तानच्या नेव्हीला हायटेक होण्यासाठी अजून बराच काळ लागणार असल्याचं स्पष्ट आहे, असं तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र ही उणीव लक्षात घेऊन चीन 2022 पर्यंत पाकिस्तानच्या नौदलाला बळकट करण्यासाठी झटतोय. त्यामुळे जमिनीबरोबरच आता समुद्रातही चीनवर कायम नजर ठेवावी लागणार आहे.

हेही वाचा :

चीनला धूळ चारण्यासाठी जगातल्या चार सर्वात शक्तिशाली नौदलांची एकी, समुद्रात युद्धाभ्यास होणार

China Flood | पुरावे मिटवण्यासाठी चीनने वुहानमध्ये महापूर आणला?

धुमकेतूवरील सोने लुटीसाठी अमेरिका-चीनमध्ये धुमश्चक्री, सोन्याची किंमत चक्रावून सोडणारी

India China Sea War and Pakistan

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी