AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“26/11 चा बदला घेण्यासाठीही वायूसेना सज्ज होती, पण सरकारने परवानगी दिली नाही”

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 12 विमानांमधून एक हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. पण यानिमित्ताने एक जुना किस्सा समोर आलाय. मुंबईतील ताज हॉटेलवर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतरही वायूसेनेकडून अशाच प्रकारची कारवाई केली जाणार होती. पण त्याला सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्याची खंत […]

26/11 चा बदला घेण्यासाठीही वायूसेना सज्ज होती, पण सरकारने परवानगी दिली नाही
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 12 विमानांमधून एक हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. पण यानिमित्ताने एक जुना किस्सा समोर आलाय. मुंबईतील ताज हॉटेलवर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतरही वायूसेनेकडून अशाच प्रकारची कारवाई केली जाणार होती. पण त्याला सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्याची खंत माजी अधिकाऱ्याने बोलून दाखवली.

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. शेकडो निरापराध लोकांचा बळी या हल्ल्यात गेला. तेव्हाही भारतीयांमध्ये संतापाची लाट होती. वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेण्याची तयारी केली होती. पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना या हल्ल्यासाठी जबाबदार होती. त्यावेळचे विंग कमांडर मोहंतो पँगिंग मिराज 2000 आणि सुखोई एसयू-30 लढाऊ विमानांच्या ताफ्यासह पीओकेमधील मुजफ्फराबादमध्ये जाऊन एअर स्ट्राईकचं नेतृत्त्व करण्यासाठी तयार होते.

मोहंतो पँगिंग यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिलाय. ते म्हणतात, 26/11 हल्ल्यानंतर आम्हीही मुजफ्फराबादमध्ये घुसून अशाच प्रकारच्या एअर स्ट्राईकची योजना आखली होती. मी सुखोई स्क्वॉड्रनचं नेतृत्त्व करत होतो. आम्ही योजना पूर्णपणे गुप्त ठेवली आणि मुलांना खोटं सांगितलं की आपण दुसरीकडे जातोय, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणतात, “ही योजना कधीही प्रत्यक्षात उतरली नाही. आम्ही कामाला लागलो होतो आणि जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त वाट पाहिली. पण तेव्हाच्या सरकारने परवानगी दिली नाही. पण मी आज खुश आहे की आपण एअर स्ट्राईक केली.” 26/11 हल्ला झाला तेव्हा केंद्राय काँग्रेसप्रणित यूपीए-1 सरकार होतं. तर मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते.

पाकिस्तानवर अखेर कारवाई केल्याचा आनंद या माजी अधिकाऱ्याने व्यक्त केलाय. अखेर पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प वायूसेनेच्या मिराज 2000 ने उद्ध्वस्त केले. आम्हीही 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर अशीच तयारी केली होती. मुजफ्फराबादमधील दहशतवाद्यांचे तळ उडवणार होतो, पण सरकारने निर्णय घेतला नाही. देर आए दुरुस्त आए.. चीअर्स!, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.