AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“26/11 चा बदला घेण्यासाठीही वायूसेना सज्ज होती, पण सरकारने परवानगी दिली नाही”

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 12 विमानांमधून एक हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. पण यानिमित्ताने एक जुना किस्सा समोर आलाय. मुंबईतील ताज हॉटेलवर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतरही वायूसेनेकडून अशाच प्रकारची कारवाई केली जाणार होती. पण त्याला सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्याची खंत […]

26/11 चा बदला घेण्यासाठीही वायूसेना सज्ज होती, पण सरकारने परवानगी दिली नाही
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 12 विमानांमधून एक हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. पण यानिमित्ताने एक जुना किस्सा समोर आलाय. मुंबईतील ताज हॉटेलवर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतरही वायूसेनेकडून अशाच प्रकारची कारवाई केली जाणार होती. पण त्याला सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्याची खंत माजी अधिकाऱ्याने बोलून दाखवली.

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. शेकडो निरापराध लोकांचा बळी या हल्ल्यात गेला. तेव्हाही भारतीयांमध्ये संतापाची लाट होती. वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेण्याची तयारी केली होती. पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना या हल्ल्यासाठी जबाबदार होती. त्यावेळचे विंग कमांडर मोहंतो पँगिंग मिराज 2000 आणि सुखोई एसयू-30 लढाऊ विमानांच्या ताफ्यासह पीओकेमधील मुजफ्फराबादमध्ये जाऊन एअर स्ट्राईकचं नेतृत्त्व करण्यासाठी तयार होते.

मोहंतो पँगिंग यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिलाय. ते म्हणतात, 26/11 हल्ल्यानंतर आम्हीही मुजफ्फराबादमध्ये घुसून अशाच प्रकारच्या एअर स्ट्राईकची योजना आखली होती. मी सुखोई स्क्वॉड्रनचं नेतृत्त्व करत होतो. आम्ही योजना पूर्णपणे गुप्त ठेवली आणि मुलांना खोटं सांगितलं की आपण दुसरीकडे जातोय, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणतात, “ही योजना कधीही प्रत्यक्षात उतरली नाही. आम्ही कामाला लागलो होतो आणि जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त वाट पाहिली. पण तेव्हाच्या सरकारने परवानगी दिली नाही. पण मी आज खुश आहे की आपण एअर स्ट्राईक केली.” 26/11 हल्ला झाला तेव्हा केंद्राय काँग्रेसप्रणित यूपीए-1 सरकार होतं. तर मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते.

पाकिस्तानवर अखेर कारवाई केल्याचा आनंद या माजी अधिकाऱ्याने व्यक्त केलाय. अखेर पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प वायूसेनेच्या मिराज 2000 ने उद्ध्वस्त केले. आम्हीही 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर अशीच तयारी केली होती. मुजफ्फराबादमधील दहशतवाद्यांचे तळ उडवणार होतो, पण सरकारने निर्णय घेतला नाही. देर आए दुरुस्त आए.. चीअर्स!, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

Follow Us
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!