AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“26/11 चा बदला घेण्यासाठीही वायूसेना सज्ज होती, पण सरकारने परवानगी दिली नाही”

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 12 विमानांमधून एक हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. पण यानिमित्ताने एक जुना किस्सा समोर आलाय. मुंबईतील ताज हॉटेलवर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतरही वायूसेनेकडून अशाच प्रकारची कारवाई केली जाणार होती. पण त्याला सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्याची खंत […]

26/11 चा बदला घेण्यासाठीही वायूसेना सज्ज होती, पण सरकारने परवानगी दिली नाही
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 12 विमानांमधून एक हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. पण यानिमित्ताने एक जुना किस्सा समोर आलाय. मुंबईतील ताज हॉटेलवर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतरही वायूसेनेकडून अशाच प्रकारची कारवाई केली जाणार होती. पण त्याला सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्याची खंत माजी अधिकाऱ्याने बोलून दाखवली.

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. शेकडो निरापराध लोकांचा बळी या हल्ल्यात गेला. तेव्हाही भारतीयांमध्ये संतापाची लाट होती. वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेण्याची तयारी केली होती. पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना या हल्ल्यासाठी जबाबदार होती. त्यावेळचे विंग कमांडर मोहंतो पँगिंग मिराज 2000 आणि सुखोई एसयू-30 लढाऊ विमानांच्या ताफ्यासह पीओकेमधील मुजफ्फराबादमध्ये जाऊन एअर स्ट्राईकचं नेतृत्त्व करण्यासाठी तयार होते.

मोहंतो पँगिंग यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिलाय. ते म्हणतात, 26/11 हल्ल्यानंतर आम्हीही मुजफ्फराबादमध्ये घुसून अशाच प्रकारच्या एअर स्ट्राईकची योजना आखली होती. मी सुखोई स्क्वॉड्रनचं नेतृत्त्व करत होतो. आम्ही योजना पूर्णपणे गुप्त ठेवली आणि मुलांना खोटं सांगितलं की आपण दुसरीकडे जातोय, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणतात, “ही योजना कधीही प्रत्यक्षात उतरली नाही. आम्ही कामाला लागलो होतो आणि जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त वाट पाहिली. पण तेव्हाच्या सरकारने परवानगी दिली नाही. पण मी आज खुश आहे की आपण एअर स्ट्राईक केली.” 26/11 हल्ला झाला तेव्हा केंद्राय काँग्रेसप्रणित यूपीए-1 सरकार होतं. तर मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते.

पाकिस्तानवर अखेर कारवाई केल्याचा आनंद या माजी अधिकाऱ्याने व्यक्त केलाय. अखेर पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प वायूसेनेच्या मिराज 2000 ने उद्ध्वस्त केले. आम्हीही 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर अशीच तयारी केली होती. मुजफ्फराबादमधील दहशतवाद्यांचे तळ उडवणार होतो, पण सरकारने निर्णय घेतला नाही. देर आए दुरुस्त आए.. चीअर्स!, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.