AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम

रत्नागिरी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येताय मग जरा जपून कारण मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य पर्यटक कोकणाकडे सेलिब्रेशनसाठी येत आहेत. पण मुंबई सोडल्यावर ट्रॅफिक जाममुळे सध्या अनेक पर्य़टकांचा खोळंबा होताना दिसत आहे. मुंबई ते गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले आहे. दोन-दोन तास प्रवासी ट्रॅफिकमध्ये अडकून राहिले आहेत. विकेंड, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण आपल्या […]

मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

रत्नागिरी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येताय मग जरा जपून कारण मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य पर्यटक कोकणाकडे सेलिब्रेशनसाठी येत आहेत. पण मुंबई सोडल्यावर ट्रॅफिक जाममुळे सध्या अनेक पर्य़टकांचा खोळंबा होताना दिसत आहे. मुंबई ते गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले आहे. दोन-दोन तास प्रवासी ट्रॅफिकमध्ये अडकून राहिले आहेत.

विकेंड, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण आपल्या मित्र परिवारासोबत थेट गोवा आणि कोकण गाठत आहे. मात्र येथे त्यांना ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी ट्रॅफिक जामची कसरत करत कसे बसे कोकणात पोहचत आहेत. तब्बल 15 ते 16 तासांचा प्रवासकरून पर्यटक रत्नागिरीत दाखल झालेत. सध्या मुंबई गोवा महामार्गावर कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या दिसत आहे.

पेण वडखळ जवळ दीड ते दोन तासांच्या ट्रॅफिक जामनं पर्यटक हैराण झाले आहेत. या ट्रॅफिक जाममुळे मुंबईतून रत्नागिरी येण्यासाठी तब्बल 15 तासांचा प्रवास करावा लागत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे अधिकचा वेळ लागतोय. तर रत्नागिरीतून गोवा आणि सिंधुदुर्गात जाणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहे.

अशीच परिस्थिती मुंबई-पुणे मार्गावरही दिसत आहे. विकेंड म्हटलं की मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या धावपळीच्या दुनियेतून आराम मिळवण्यासाठी मुंबई बाहेर जातो. पण तेथेही ट्रॅफिक जाममुळे चांगलीच पंचायत झालेली दिसत आहे.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.