AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धार्मिक स्थळं, जिम आणि रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय लवकरच : अनिल परब

सगळे निकष तयार करून मंदिरे उघडण्याचा प्रस्ताव सरकार आणेल, असेही अनिल परब यांनी (Anil Parab on Maharashtra Unlock 4 Guidelines)  सांगितले. 

धार्मिक स्थळं, जिम आणि रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय लवकरच : अनिल परब
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 01, 2020 | 12:42 AM
Share

मुंबई : राज्य सरकारकडून अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. या गाईडलाईन्सनुसार जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी ई-पास अट रद्द करण्यात आली आहे. मात्र धार्मिक स्थळं, जिम तसेच रेस्टॉरंटला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र “याबाबतचा निर्णय या आठवड्यात घेतला जाईल,” अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. (Anil Parab on Maharashtra Unlock 4 Guidelines)

“राज्यातील जिम आणि हॉटेल्स-लॉजमध्ये फरक आहे. हॉटेल्स लॉज सुरु केली असली तरी ते 100 टक्के भरतील असं नाही. कारण अर्थचक्र अजून पूर्णपणे सुरु झालेलं नाही. जिममध्ये लोकांना येणारा घाम, जोरजोरात होणारा श्वासोच्छवास या सर्व गोष्टी लक्षात घेता जिम कशा सुरु करता येतील याबाबत निर्णय घेतला जाईल,” असे अनिल परब यांनी सांगितले.

जिम, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळं यांच्याबाबतचा निर्णय घेण्याचा विषय या आठवड्यात सुरु होईल. रेल्वेबाबतचा निर्णय सर्वप्रथम केंद्र सरकार घेईल. मग राज्य सरकार घेईल. दिल्लीत मेट्रो सुरु होतं आहे. पण त्याचे परिणाम काय होतात, असेही ते म्हणाले.

“मुंबईत ट्रेनमध्ये गर्दी होते. लोक जवळजवळ बसतात. त्याचे काय परिणाम होतात. या गोष्टींचा विचार करुनच मग निर्णय होईल,” असेही त्यांनी सांगितले.

“राज्यातील ई-पास रद्द करण्याची मागणी गेले अनेक दिवस होत होती. एसटीमध्ये ई-पास रद्द केला होता. एसटीतून कोण कुठे जातं याची नोंद होत होती. पण खाजगी वाहनातून प्रवाशांची ती नोंद होत नव्हती. त्यामुळे आम्ही ई-पास ठेवला होता. पण महाराष्ट्रातील परिस्थिती बऱ्यापैकी सुधारते आहे. अर्थचक्र चालण्याच्या दृष्टीने लोकांची विविध जिल्ह्यात वाहतूक महत्वाची आहे. त्यामुळे ई पास रद्द केला आहे,” असेही अनिल परब यांनी सांगितले.

मंदिर उघडण्याबाबत सरकार सकारात्मक

“वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी सुद्धा दिली. याचा अर्थ सरकारने मंदिरे उघडली असा नाही. आम्ही सकारात्मक आहोत. मंदिरे आमच्या श्रद्धेचा भाग आहेत. ती उघडली गेली पाहिजेत. पण ती उघडताना त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची काळजी घेणं गरजेचं आहे. ते सगळे निकष तयार करून मंदिरे उघडण्याचा प्रस्ताव सरकार आणेल,” असेही अनिल परब यांनी सांगितले.

प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन ही अत्यंत दु: खद घटना आहे. ते अतिशय विद्वान होते. त्यांनी आपलं पूर्ण करिअर संघर्षातून घडवलं. एक आदर्श नेता आपल्यातून गेला. शिवसेनेच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनिल परब यांनी आदरांजली व्यक्त केली.

राष्ट्रपती पदाचे उमेदवार असताना त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. मी त्यावेळी मातोश्रीत उपस्थित होतो. त्यांना जवळून पाहण्याचा योग होता. त्यांच्या निवडणुकीपाठोपाठ माझी विधानपरिषदेची निवडणूक होती. ते अतिशय विद्वान होते. त्यांचे न्यूक्लियर डिलवरचे भाषण मी ऐकले होते. त्यांनी ज्याप्रकारे सरकारची बाजू मांडली आज संसदीय कार्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडताना आपल्या सरकारची बाजू कशी मांडायची हे मी त्यांच्यात बघितलं. त्यांची संसदीय भाषणे प्रेरणादायी आहेत, तुम्हाला वाटचाल शिकवतात, अशी आठवणही अनिल परब यांनी सांगितले.  (Anil Parab on Maharashtra Unlock 4 Guidelines)

संबंधित बातम्या : 

Unlock 4 | ई-पास रद्द, हॉटेल सुरु, 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज बंद, राज्य सरकारची नियमावली

‘वंचित बहुजन आघाडीने हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला का?’ प्रकाश आंबेडकर म्हणतात…

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं