AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरीप, भातशेतीनंतर आता फळबागांना अवकाळीचा फटका, सिंधुदुर्गात फळ बागायतदार अडचणीत, काय आहे उपाययोजना?

यंदा अनियमित वेळी होत असलेल्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळबागांना अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे पण बागा जोपासण्यासाठी केलेला खर्चही वाया जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर होतेच पण बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने आंबा आणि काजू शेतीचे नुकसान होत आहे.

खरीप, भातशेतीनंतर आता फळबागांना अवकाळीचा फटका, सिंधुदुर्गात फळ बागायतदार अडचणीत, काय आहे उपाययोजना?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 24, 2021 | 12:07 PM
Share

सिंधुदुर्ग : यंदा अनियमित वेळी होत असलेल्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळबागांना अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे पण बागा जोपासण्यासाठी केलेला खर्चही वाया जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर होतेच पण बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने आंबा आणि काजू शेतीचे नुकसान होत आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबागेचे क्षेत्र आहे. उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी पिक पध्दतीमध्ये बदल केला आहे. परंतू, वातारणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर होत आहे. सध्या आंब्याला मोहर लागला आहे तर काजूही बहरात आहे. असे असतानाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत आहे.

काय आहे कृषितज्ञांचा सल्ला

अवकाळी पावसाचा परिणाम आंबा आणि काजू पिकावर होणार आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात मोहोर आला आहे तर इतर भागात पालवी फुटलेली आहे. या पावसामुळे मोहोर गळून जाऊ शकतो व पालविला कीड व बुरशी धरण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे पीकाला ही उशीर होणार. त्यामुळे पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी जंतू नाशक फवारणी करणं गरजेचं असल्याचे कृषितज्ञ पंकज दळी यांनी सांगितले आहे.

हिवाळ्यात पावसाळ्याची अनुभती

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण तर होतेच पण बुधवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासून सूर्यदर्शन देखील झाले नाही. वातावरणात काळोख दाटला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, भर हिवाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत असून वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम फळबागांवर होत आहे. आंब्याच्या मोहर गळून पडत आहे तर काजू शेतीचे नुकसान होत आहे. ऐन बहरात असतानाच पावसाने कहर केलेला आहे. त्यामुळे उत्पादनाबाबत साशंका व्यक्त होत आहे.

नुकसान न भरुन निघणारे

ऐन फळधारणा होण्याच्या प्रसंगीच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आंब्याचा मोहर गळत आहे तर काजुच्या पिकाची मोडतोड होऊ लागली आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे फळबागा आडव्या झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भातशेतीची कामे संपलेली होती. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले नाही पण जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील बहुतांश गावात,वैभववाडी तालुक्यात व कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात या अवकाळी पावसाने हजेरी लावली.

संबंधित बातम्या :

शेततळ्यांच्या संदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

एकरकमी ‘एफआरपी’ तर सोडाच पण ऊसबिलही हप्त्याने देण्यासाठी साखर कारखान्यांची अनोखी शक्कल

देशासाठी ऐतिहासिक दिवस, कृषी कायदे रद्द करण्यावर आज शिक्कमोर्तब होणार, मोदी कॅबिनेटची बैठक

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप