AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भातील पुराचा गडचिरोली, चंद्रपुराला मोठा फटका, अनेकांचे संसार उघड्यावर, गोरगरिबांचंही प्रचंड नुकसान

गडचिरोली जिल्ह्यातही शेतकरी आणि गोरगरिबांचं प्रचंड नुकसान झालं. देसाईगंज, आरमोरी, अहेरी आणि सिरोंचा तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला.

विदर्भातील पुराचा गडचिरोली, चंद्रपुराला मोठा फटका, अनेकांचे संसार उघड्यावर, गोरगरिबांचंही प्रचंड नुकसान
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Sep 02, 2020 | 11:14 PM
Share

नागपूर : मध्य प्रदेशातल्या धरणातून पाण्याचा विसर्ग असो (Vidarbha Flood Damage) की गोसीखुर्दमधून, वेळीच अलर्ट न दिल्यानं लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे. याच नुकसानीची पाहणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली. तर तात्काळ 10 हजारांच्या मदतीची घोषणा सरकारनं केली (Vidarbha Flood Damage).

हे पावसामुळे झालेले नुकसान नाही. तर मध्य प्रदेशातील संजय सरोवर आणि गोसेखुर्द धरणातल्या विसर्गामुळं आलेल्या महापुरामुळं झालं. शेती नष्ट झाली, घरं कोसळली, तर धान्यंही महापुराच्या पाण्यात भिजलं. घरात चिखलाचं साम्राज्य पसरलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही या नुकसानीची पाहणी केली.

महापूर ओसरल्यानंतर आता पडलेली घरं आणि मोडलेला संसार डोळ्यासमोर आहे. मुलं आणि पत्नीला पुराच्या पाण्यातून वाचवताना, झुल्लर गावातील ज्ञानेश्वर यांच्या जगण्याचा आधार असलेल्या शेळ्याही वाहून गेल्या.

गडचिरोली जिल्ह्यातही शेतकरी आणि गोरगरिबांचं प्रचंड नुकसान झालं. देसाईगंज, आरमोरी, अहेरी आणि सिरोंचा तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला. अन्नधान्य आणि कपड्यांसह घरातलं सामनानंही वाहून गेलं. तर राहता येईल अशी घरांची स्थितीही राहिलेली नाही.

शेतीबद्दल बोलायचं झालं तर शेतात तुडूंब पाणी साचलं आणि पीकंही नष्ट झाली. गडचिरोलीत जवळपास 10 हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली (Vidarbha Flood Damage).

चंद्रपूर जिल्ह्यातलीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गोसेखुर्द धरणातील विसर्गामुळं वैनगंगा नदीला महापूर आला. ब्रम्हपुरीतल्या पारडगावात आता पडलेल्या घराच्या ढिगाऱ्यात काही सामान शिल्लक आहे का? याच शोध घेतला जातो. तर कुठं कुठं घराची साफसफाई सुरु आहे. महापुरामुळे शेतातली पीकं पूर्णपणे आडवी झालीत..कारखान्यांमध्ये अजूनही स्वीमिंग पूर सारखं दृश्ंय आहे

सरकारनं आता तातडीची 10 हजारांची मदत जाहीर केली. पंचनामे होऊनही प्रत्यक्ष झालेलं नुकसान काही भरुन निघणार नाही. पण तातडीची 10 हजारांची मदत त्वरित मिळावी, ही अपेक्षा आहे. कारण कपडेही वाहून गेलेत आणि घरातलं अन्नधान्यही भिजलं.

Vidarbha Flood Damage

संबंधित बातम्या :

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीत पूर, गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली