AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टिप्स करा फॉलो

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता आणि आर्द्रता वाढल्याने लोकांच्या पचनसंस्थेवरही परिणाम होतो, ज्यामुळे ॲसिडिटीच्या समस्या खूप वाढतात. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तज्ञांनी दिलेल्या काही आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकता.

उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास 'या' सोप्या आयुर्वेदिक टिप्स करा फॉलो
AcidityImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Apr 14, 2025 | 1:46 PM
Share

आपण अनेकदा उशीरा अन्नाचे सेवन केल्याने पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे. पण उन्हाळ्यात ही समस्या खूप वाढते. कारण या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रता वाढल्याने पचनक्रियेवरही परिणाम होतो. अ‍ॅसिडिटीमुळे अस्वस्थता, छातीत जळजळ आणि पोट खराब होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, कमकुवत पचनक्रियेमुळे, खाल्लेले किंवा प्यायलेले काहीही पचवणे कठीण होऊ शकते.

उन्हाळ्याच्या हंगामात पोटाची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. म्हणतात. बऱ्याचदा खाण्यापिण्यात निष्काळजीपणामुळे अन्नातून विषबाधा होण्याची समस्या देखील उद्भवते. म्हणून, तुमच्या आहारात दह्याचा समावेश नक्कीच करा. हे प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे आणि पोट थंड ठेवते. पण जर तुम्हाला वारंवार अ‍ॅसिडिटीची समस्या येत असेल तर तुम्ही काही आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकता. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

जिरे आणि धणे पाणी

जिरे आणि धणे दोन्ही पचन सुधारतात. यामुळे अ‍ॅसिडिटी कमी होते. यासाठी तुम्ही जिरे आणि धणे या दोघांचे पाणी तयार करून प्यायल्याने तुम्हाला पोटाला थंडावा मिळतो. बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि पोटदुखीसाठी देखील हे पाणी खूप प्रभावी आहे. एक ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे आणि 1चमचा धणे टाका आणि ते उकळवा. नंतर ते थंड करून गाळुन हे पाणी प्या.

बडीशेप आणि कोथिंबीर पाणी

बडीशेपचे सेवन पोटाला थंडावा देते. हे केवळ पोट थंड ठेवत नाही तर तोंडाची दुर्गंधी देखील दूर करते. जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही कोथिंबीर आणि बडीशेपचे पाणी पिऊ शकता. एक ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप आणि कोथिंबीर एकत्र करून चांगले उकळवा. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यावर तुम्ही पिऊ शकता.

नारळ पाणी

नारळ पाणी आम्लपित्त कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे पचनसंस्थेला शांत करते. यामुळे चयापचय देखील वेगवान होतो. वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज एक नारळ पाणी प्यायल्याने अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

ओवा आणि गूळ

ओवा खाल्ल्याने पोटातील आम्लता कमी होण्यास मदत होते. अशातच ओवा आणि गुळाचे एकत्र सेवन केल्याने पोटातील गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होते. यासाठी 1 चमचा ओवा आणि गुळाचा एक छोटा तुकडा घेऊन त्याचे सेवन करा. यामुळे गॅसपासून लवकर आराम मिळतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.