AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Food | उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात आवर्जून सामील करा ‘हे’ घटक, आजारांपासून राहाल दूर!

हवामानातील बदलांमुळे आपल्या जीवनशैलीत आणि अन्नामध्येही बदल करावा लागतो.

Summer Food | उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात आवर्जून सामील करा ‘हे’ घटक, आजारांपासून राहाल दूर!
| Edited By: | Updated on: Mar 07, 2021 | 8:11 AM
Share

मुंबई : हवामानातील बदलांमुळे आपल्या जीवनशैलीत आणि अन्नामध्येही बदल करावा लागतो. आता हिवाळ्याचा हंगाम संपला आणि उन्हाळ्याने लवकरच येण्याच्या वाटेवर आहे. यामुळे आपले खाणेपिणेही ऋतूनुसार बदलले पाहिजे. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा आरोग्यावर देखील मोठा परिणाम होतो आणि थोडासाही निष्काळजीपणा आपल्याला या दिवसांत आजारी बनवू शकतो. (Add these foods in your summer diet will keep you healthy).

उन्हाळ्याच्या हंगामात, तळलेल्या आणि मासालेदार पदार्थांपासून थोडेसे दूर राहावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. उन्हाळ्यात पाण्याअभावी निर्जलीकरण होऊ शकते. म्हणून या हंगामात रस, फळ, नारळ पाण्याचे सेवन केले पाहिजे. या व्यतिरिक्त अन्नामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असणारे घटक सामील करावेत. चला तर, जाणून घेऊया या हंगामात आपण कोणत्या गोष्टींचे सेवन केल्याने शरीर इतर रोगांपासून दूर राहील…

टोमॅटो टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा घटक अँटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हितामिन सीने समृध्द आहे. टोमॅटोमध्ये लायकोपीन सारखे फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे गंभीर आजार बरे होण्यास मदत होते.

दही उन्हाळ्यात दही खाणे केव्हाही चांगले. हे खाल्ल्याने तुम्हाला आतून थंडावा वाटतो. यात प्रोबायोटिक्स असतात, जे पाचन प्रणाली मजबूत करण्यास मदत करतात. दह्यामध्ये भरपूर प्रोटीन असते, ज्यामुळे दही खाल्ल्यानंतर आपल्याला बराच वेळ भूक लागणार नाही. भूक न लागल्यामुळे आपण अनहेल्दी पदार्थ खाणे टाळू शकू.

संत्री संत्र्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीरातून निघणाऱ्या घामाद्वारे पोटॅशियम बाहेर सोडले जाते, ज्यामुळे शरीरात कमजोरी होण्याची समस्या वाढते. म्हणून या हंगामात संत्रे खाणे फायद्याचे आहे. संत्र्यामध्ये 80 टक्के रस असतो, जो शरीराला हायड्रेटेड ठेवतो.

ग्रीन टी उन्हाळ्यात आपण कॉफीऐवजी हर्बल चहा पिऊ शकता. ग्रीन टी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. जर आपल्याला या हंगामात गरम ग्रीन टी पिणे आवडत नसेल, तर आपण तो थंड करून पिऊ शकतो. हे पेय पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे (Add these foods in your summer diet will keep you healthy).

ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी बेरी फायबरचा चांगला स्रोत आहेत. आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास ब्लॅकबेरीचे सेवन करावे. त्यात व्हिटामिन सी समृद्ध प्रमाणात आढळतो.

सलाड उन्हाळ्याच्या काळात आहारात सलाडचा समावेश आवर्जून करावा. सलाडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध प्रमाणात असतात. सलाडमध्ये आपण गाजर, टोमॅटो, द्राक्षे, काकडी इत्यादी वापरू शकता.

कलिंगड कलिंगड शरीर थंड ठेवण्यास मदत करतो. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. यात लायकोपीन असते, जे त्वचेला सूर्यापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.

संबंधित बातम्या : 

(Add these foods in your summer diet will keep you healthy)

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.