AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावणे फायदेशीर? तेल लावताना करू नका ‘या’ चुका

रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीच्या एक तास आधी केसांना तेल लावावे. कारण जर तुम्ही केसांना तेल लावल्यानंतर बाहेर गेलात तर तुमच्या केसांवर धूळ आणि घाण जमा होते ज्यामुळे कोंडा होतो. म्हणून, केसांना तेल लावण्यापूर्वी, वेळ आणि पद्धतीची विशेष काळजी घ्या. तसेच केसांना तेल लावताना कोणत्या चुका टाळ्या पाहिजे हे आपण आजच्या लेखातुन जाणुन घेऊयात...

रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावणे फायदेशीर?  तेल लावताना करू नका 'या' चुका
केसाना तेल लावण्यापूर्वी हे जरूर वाचा
| Edited By: | Updated on: Apr 25, 2025 | 3:27 PM
Share

प्रत्येकजण केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करत असतात. त्यासोबत हेअर मास्कच्या मदतीने केसांची योग्स काळजी घेता येते. अशातच काहीजण केसांच्या काळजीकरिता केसांना तेलाने मसाज करता आणि रात्रभर तसेच ठेवतात. त्यामुळे केसांची मुळ तेल योग्यरित्या शोषले घेतात. खरंतर केसांना तेल लावल्याने त्यांना चांगले पोषण मिळते आणि केस नैसर्गिकरित्या चमकतात. पण आपल्यापैकी अनेकांच्या मनात असा संभ्रम आहे की रात्री केसांना तेल लावण्याने केसांमध्ये असलेली धूळ आणि घाण केसांना तशीच राहते ,ज्यामुळे कोंडा किंवा इतर केसांच्या समस्या उद्भवतात.

एवढेच नाही तर केस गळणे देखील सुरू होते. अशा परिस्थितीत, रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावावे की नाही हा प्रश्न पडतो. चला तर मग जाणुन घेऊयात याबद्दल…

रात्री देखील केसांना तेल लावायला हवे?

रात्री केसांना तेल लावून झोपण्याचे अनेक फायदे आहेत. हे तुमचे केस तुटण्यापासून रोखते आणि तेल लावल्याने केसांना भरपूर पोषक तत्वे देखील मिळतात. ज्यामुळे केस निरोगी, रेशमी आणि चमकदार बनतात. केसांना तेल लावून रात्री झोपल्याने, तेलात असलेले फॅटी अ‍ॅसिड आणि पोषक घटक स्कॅल्पच्या छिद्रांमध्ये खोलवर शोषले जातात.

रात्रभर डोक्याला तेल लावून झोपल्याने स्कॅल्पला ओलावा मिळण्यास मदत होते. जर तुमचे केस खूप फ्रिजी आणि कुरळे असतील तर तुम्ही तुमच्या केसांना नक्कीच तेल लावावे. हे खूप फायदेशीर आहे. केसांना तेल लावल्याने स्कॅल्प ओलसर राहते आणि केस फ्रिजी होण्यापासून वाचतात आणि खाजही कमी होते.

केसांना तेल लावताना या चुका करू नका

केसांमध्ये योग्य तेल वापरा:  जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना तेल लावता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या केसांवर कोणत्या प्रकारचे तेल वापरत आहात. केसांना तेल लावण्यासाठी नेहमी नारळ तेल, ऑलिव्ह तेल, आर्गन तेल आणि बदाम तेल लावा. रात्रभर केसांमध्ये तसेच राहू द्या.

तेल लावण्याची पद्धत:  जेव्हाही तुम्ही केसांना तेल लावता तेव्हा ते मर्यादेत लावा. केसांमधून तेल बाहेर पडेल अशा पद्धतीने तेल लावू नका. जास्त तेल लावणे टाळा. जेव्हाही तुम्ही तेल लावता तेव्हा ते केसांच्या मुळांना आणि टोकांना लावा जेणेकरून केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळेल. तेल लावताना तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुम्ही वेगवेगळी तेले एकत्र मिसळून ते लावू शकता. जसे की ऑलिव्ह, नारळ आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण लावा.

डोक्याला दाब देऊन मालिश करू नका: जेव्हाही तुम्ही केसांना तेल लावून मालिश कराल तेव्हा ते हलक्या हातांनी करा. कधीही उलट्या हातांनी किंवा जोर देऊन मालिश करू नका. यामुळे तुमच्या स्कॅल्पच्या आत रक्ताभिसरण सुधारते. रात्री जेव्हा तुम्ही केसांना तेल लावता तेव्हा झोपण्यापूर्वी केसांना शॉवर कॅप किंवा टॉवेलने गुंडाळा. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी केस पूर्णपणे धुवा. जेणेकरून केसांमधून तेल व्यवस्थित निघून जाईल, अन्यथा घाण आणि कोंडा दिसू लागेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.