AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही अतिविचाराचे बळी आहात का? या सवयीला तोंड देण्यासाठी वापरा या टिप्स

सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. यामध्येच एक समस्या म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे. तुम्हाला देखील कोणत्याही गोष्टीवर अतिविचार करण्याची सवय असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करु शकतात.

तुम्हीही अतिविचाराचे बळी आहात का? या सवयीला तोंड देण्यासाठी वापरा या टिप्स
| Updated on: Feb 01, 2024 | 5:04 PM
Share

Mental Health : अनेक जण सध्या तणावात जगत आहेत. सध्याचं स्पर्धेचे युग आणि चुकीची जीवनशैली यामुळे लोकांमध्ये तणाव वाढला आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी काही गोष्टींवर भर दिला पाहिजे. त्यासाठी निरर्थक गोष्टींवर विचार न करणे. पण सध्या अतिविचार करणाऱ्यांची एक श्रेणी वाढत आहे जी कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त विचार करू लागतात. ज्याचा मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. मानसिक आरोग्य हे आपल्या शारीरिक आरोग्याशी जोडलेले आहे. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे त्याचे गांभीर्य समजून घेणे आणि त्यापासून सुटका करण्याचे उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.

भावनिक असलेले लोकं अतिविचार करतात. सर्व काही ते मनावर घेतात आणि पुढे होणार याची चिंता सतावत असते. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर प्रभाव पडतो. अनेक वेळा यामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्येही जाते.

जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बऱ्याच वेळा लोक ओव्हरथिंकिंगला सामोरे जाण्यासाठी दारू किंवा सिगारेटचा अवलंब करतात, ज्या अधिक हानिकारक आहे. त्यामुळे या सवयीपासून मुक्त होण्यासाठी, या चुकीच्या पद्धतींचा अवलंब करण्याऐवजी, तुम्ही येथे दिलेल्या टिप्सची मदत घेऊ शकता.

स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये व्यस्त ठेवा

रिकामं मन हे सैतानाचं घर आहे असं म्हणतात, त्यामुळे जर एखाद्या गोष्टीने तुम्हाला खूप त्रास दिला असेल, ज्याचा विचार करून तुम्हाला राग येत असेल, तर त्याला शांत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवणे. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतून राहण्याचा प्रयत्न करा.

नकारात्मक लोकांपासून दूर रहा

अशा लोकांपासून अंतर ठेवा जे तुम्हाला नकारात्मक भावना देतात. जर समोरची व्यक्ती तुम्हाला मुद्दाम त्रास देत असेल तर त्याच्याशी त्याच पद्धतीने बोला आणि त्याला सामोरे जा. जर तुमचे मन हे समर्थन करत नसेल तर त्यांच्याशी संपर्क संपवणे चांगले.

व्यायाम आणि ध्यान करा

मन शांत ठेवण्यासाठी योग आणि ध्यान करा. ध्यान तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते, ज्यामुळे अतिविचार करण्याची सवय व्यवस्थापित करणे सोपे होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.