AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात आजारी पडताय? स्वत:चं रक्षण कसं करावं? रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय!

रामदेवाबाबांनी आतापर्यंत अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून मात करता येते, असे सांगितलेले आहे. ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय असतात. ते सोशल मीडियावर आपल्या पतंजली प्रोडक्ट्सची जाहिरात करताना दिसतात. तसेच ते आरोग्याची कशी काळजी घ्यावी? काय खावे? याबाबतही सांगताना दिसतात. दरम्यान आता रामदेवाबाबा यांनी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वत:ला कसे वाचवावे आणि या आजारावर कशी मात करावी, याबाबत सांगितले आहे.

पावसाळ्यात आजारी पडताय? स्वत:चं रक्षण कसं करावं? रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय!
baba ramdev
| Updated on: Aug 21, 2025 | 7:47 PM
Share

Patanjali  Baba Ramdev: योगगुरू रामदेवबाबा नेहमीच आयुर्वेद आणि योगाबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. रामदेवाबाबांनी आतापर्यंत अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून मात करता येते, असे सांगितलेले आहे. ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय असतात. ते सोशल मीडियावर आपल्या पतंजली प्रोडक्ट्सची जाहिरात करताना दिसतात. तसेच ते आरोग्याची कशी काळजी घ्यावी? काय खावे? याबाबतही सांगताना दिसतात. दरम्यान आता रामदेवाबाबा यांनी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वत:ला कसे वाचवावे आणि या आजारावर कशी मात करावी, याबाबत सांगितले आहे.

काय काळजी घ्ययला हवी?

पावसाळ्यात जिवाणू आणि बुरशीचा संसर्ग लवकर होते. यामुळेच अन्नातून विषबाधा होण्याचीही शक्यता जास्त असते. पावसाळ्यात अनेकांना सर्दी, खोकला, पोटदुखी आदी समस्या जाणवतात. या काळात ताप, डोकेदुखीचाही त्रास अनेकांना जाणवतो. त्यामुळे अशा आजारांपासून स्वत:चे रक्षण करणे फार गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात होणाऱ्या या आजारांमुळे शरीर कमकुवत होते. हे आजार होऊ नयेत म्हणून रामदेवबाबांनी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत सांगितले आहे.

ज्येष्ठमधाचे पाणी प्या, होईल फायदा- रामदेवबाबा

रामदेवबाबा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर माहिती दिलीय. तुम्हाला पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला जास्त होत असेल तर ज्येष्ठमधाचे पाणी प्यायला हवे. ज्येष्ठमधाचे पाणी पिल्यास सर्दी-खोकला कमी होतो. ज्येष्ठमधात Glycyrrhizin नावाचा एक घटक असतो. या घटकात विषाणूंवर मात करण्याची क्षमता असते. ज्येष्ठमधात अँटी ऑक्सिडंटही असतात, असे रामदेवबाबा या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Swami Ramdev (@swaamiramdev)

जेवण काय करावं?

पावसाळ्यात तुम्ही आजारी पडले तर काय करायला हवं याचीही माहिती बाब रामदेव यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही पावसाळ्यात आजारी पडले तर चार ते पाच दिवसांसाठी धान्य खाणे टाळावे. त्याऐवजी खजूर, चणे, अंजीर, पपई, उकळलेले सफरचंद खावे. हा नियम पाळल्यास तुम्हाला लगेच फरक जाणवेल, असे रामदेवबाबा यांनी सांगितले आहे.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.