AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips : पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा, वाचा !

या हंगामात केस गळती अधिक होण्याची शक्यता असते. कारण या हंगामात जास्त आर्द्रतेमुळे केस तुटू लागतात. म्हणूनच आपण या हंगामात आपल्या केसांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात

Hair Care Tips : पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा, वाचा !
सुंदर केस
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याबरोबरच केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. या हंगामात केस आणि त्वचा संबंधित समस्या वाढतात. या हंगामात केस गळती अधिक होण्याची शक्यता असते. कारण या हंगामात जास्त आर्द्रतेमुळे केस तुटू लागतात. म्हणूनच आपण  आपल्या केसांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी हे आज आपण बघणार आहोत. (Follow these tips to take care of your hair in the rainy season)

ओले केस विंचरणे

बऱ्याचदा घाईघाईत आपण ओले केस विंचरतो. केस पातळ होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ओले केस विंचरल्याने ते अधिक तुटतात. त्यासाठी तुम्ही केस ओले असताना ते हाताच्या बोटांनी मोकळे करा त्यानंतर टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर थोडे सुकू द्या. सुकल्यावरच केसांवरून कंगवा फिरवा.

गरम तेलाने मालिश करा

केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. तेल कोरड्या टाळूचे पोषण करण्याशिवाय हे केस मजबूत आणि चमकदार राहण्यास मदत करते. केस धुण्या अगोदर एक तास अगोदर हलक्या हाताने गरम तेलाने केसांची मालिश करा.

शॅम्पू आणि कंडिशनर

केस स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केस धुणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अँटी-बॅक्टेरिया शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. कारण यावेळी बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. शॅम्पूनंतर कंडिशनर आठवणीने लावा. शक्यतो कंडिशनर चांगल्या कंपनीचे असावे.

ताणताणाव

सतत काम आणि ऑफिस या सगळ्यामध्ये आपण तणावात असतो. पण हाच तणाव आपले केस पातळ करण्यासाठी कारणीभूत ठरतो. बऱ्याच गोष्ट तणावामुळे बिघडत असतात. त्यामुळे शक्यतो तणाव न घेणेच शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. त्यामुळे नेहमी शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

केसांना मॉइश्चराइज्ड ठेवा

पावसाळ्यात केसांची निगा राखणे खूप महत्वाचे असते. आपण सीरम वापरू शकता, जे आपल्या केसांना उष्णतेपासून वाचवेल. हे केसांना मॉइश्चरायझेशन करण्यास देखील मदत करेल. नेहमी एक मॉइश्चरायझर निवडा जे आपल्या केसांना हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ ठेवण्यास मदत करेल.

केस रगडून धुणे

केस हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. बऱ्याचदा केस धुताना मुळाशी घासून धुतले जातात. मुळांना इजा झाल्याने केस तुटतात आणि परिणामी केस पातळ होतात. केसांना आठवड्यातून तीन वेळा शॅम्पू आणि कंडिशनर हे करायलाच हवे. पण हे करत असातना केसांची काळजी घेणे गरजेचे असते. शॅम्पू लावल्यानंतर केसांना हलक्या हातांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केला तर, केसांना योग्य पोषण मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Follow these tips to take care of your hair in the rainy season)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.