AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्याच्या काळात सर्वाधिक केसगळती का होते? आपल्याला काही आजार तर नाही? जाणून घ्या..

असे बरेच लोक आहेत, ज्यांना पावसाळा अजिबात आवडत नाही. कारण पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.

पावसाळ्याच्या काळात सर्वाधिक केसगळती का होते? आपल्याला काही आजार तर नाही? जाणून घ्या..
सुंदर केस
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 4:41 PM
Share

मुंबई : असे बरेच लोक आहेत, ज्यांना पावसाळा अजिबात आवडत नाही. कारण पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे केस गळती. पावसाळ्याच्या हंगामात अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात. मात्र, केस गळती नेमकी का होते? त्यामागील नेमके काय कारण आहे हे आज आपण बघणार आहोत. (This is the reason for hair loss during the rainy season)

पावसाळ्यात केस गळणे किती सामान्य आहे?

ट्वीक इंडियाच्या अहवालानुसार डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, जर एका दिवसात 50-100 केस गळत असतील तर ते सामान्य आहे. त्याच बरोबर जर आपण पावसाळ्याबद्दल बोललो तर ही संख्या आणखी वाढू शकते आणि दररोज 200 केसांची गळती होऊ शकते. असे मानले जाते की, पावसाळ्यात केस गळणे 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढते आणि जर अशीच परिस्थिती आपल्या बाबतीत असेल तर जास्त टेन्शन घेऊ नका. ही सामान्य बाब आहे.

कोणता रोग आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे?

आपल्याला सांगितले की पावसाळ्यात केस गळणे किती सामान्य आहे. जर आपले केस यापेक्षाही जास्त गळत असतील तर आपण डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. तसे, हे लक्षात ठेवले पाहिजे की 30 टक्के पर्यंत केस गळणे सामान्य आहे. म्हणून आपल्याला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, परंतु आपले केस किती गळत आहेत यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की, ज्यामुळे आपण आपली केस गळतीची समस्या दूर करू शकतो.

पावसाळ्यात जास्त केस का गळतात?

आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल की, पावसाळ्याच्या हंगामात जास्त प्रमाणात केस का गळत असतील. याचे कारण म्हणजे पावसामुळे वातावरणात आर्द्रता असते आणि वातावरणात जास्त आर्द्रता असल्यामुळे केसांची मुळे जास्त हायड्रोजन शोषून घेतात. यामुळे आपले केस खराब होण्यास सुरूवात होते, कारण यामुळे केस नाजूक बनतात.

केसांना मॉइश्चराइज्ड ठेवा

पावसाळ्यात केसांची निगा राखणे खूप महत्वाचे असते. आपण सीरम वापरू शकता, जे आपल्या केसांना उष्णतेपासून वाचवेल. हे केसांना मॉइश्चरायझेशन करण्यास देखील मदत करेल. नेहमी एक मॉइश्चरायझर निवडा जे आपल्या केसांना हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ ठेवण्यास मदत करेल.

केस रगडून धुणे

केस हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. बऱ्याचदा केस धुताना मुळाशी घासून धुतले जातात. मुळांना इजा झाल्याने केस तुटतात आणि परिणामी केस पातळ होतात. केसांना आठवड्यातून तीन वेळा शॅम्पू आणि कंडिशनर हे करायलाच हवे. पण हे करत असताना केसांची काळजी घेणे गरजेचे असते. शॅम्पू लावल्यानंतर केसांना हलक्या हातांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केला तर, केसांना योग्य पोषण मिळते.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(This is the reason for hair loss during the rainy season)

Follow Us
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?