AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजली फोनच्या नावाने सोशल मीडियावर अफवा; जाणून घ्या सत्य

बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपकडून 6G तंत्रज्ञानाचा स्मार्टफोन लॉन्च केल्याची बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. '250MP कॅमेरा' असलेल्या या मोबाईलबाबत अनेक दावे केले जात आहेत. पण खरंच पतंजलीने असा फोन आणला आहे का? चला, जाणून घेऊया सत्य काय आहे.

पतंजली फोनच्या नावाने सोशल मीडियावर अफवा; जाणून घ्या सत्य
Baba RamdevImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jul 19, 2025 | 6:54 PM
Share

सध्या सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे की बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीनं एक जबरदस्त 6G स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्यात 250 मेगापिक्सलचा कॅमेरा, 7000mAh बॅटरी आणि 200W सुपरफास्ट चार्जिंगसारखे भन्नाट फीचर्स आहेत. मात्र, ही बातमी खरी आहे का? यामागचं सत्य काय आहे, हे समजून घेणं फार गरजेचं आहे.

वायरल अफवांमध्ये काय काय सांगितलं जातंय?

या व्हायरल पोस्ट्समध्ये सांगितलं जातंय की ‘पतंजली स्मार्टफोन’ मध्ये 250MP प्राइमरी कॅमेरा, 13MP व 33MP चे इतर सेन्सर्स, 28MP सेल्फी कॅमेरा, 6.74-इंच Super AMOLED डिस्प्ले (144Hz रिफ्रेश रेटसह), MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर, 12GB RAM व तब्बल 2TB स्टोरेज असे स्पेसिफिकेशन्स असतील. त्यात 7000mAh बॅटरी असून 200W फास्ट चार्जिंग फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्जिंग देणार आहे. किंमत 25,000 ते 33,000 रुपयांच्या दरम्यान असेल आणि यात पतंजलीचे अ‍ॅप्स आधीपासूनच इंस्टॉल असतील.

सत्य काय आहे?

या सगळ्या दाव्यांमध्ये कोणतीही तथ्य नाही. Patanjali Ayurved Ltd किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही अधिकृत संस्थेने असा कुठलाही स्मार्टफोन लाँच केला असल्याचं कुठेही अधिकृतरीत्या सांगितलेलं नाही. ना त्यांची वेबसाइट, ना प्रेस रिलीज, ना कोणतंही टेलिकॉम प्रदर्शनात पतंजली फोनची उपस्थिती हे सगळे संकेत दाखवतात की ही बातमी पूर्णपणे बनावट आहे.

6G तंत्रज्ञानाचं वास्तव काय?

आत्ताच्या घडीला संपूर्ण जगात 6G नेटवर्कवर केवळ संशोधन सुरू आहे. Apple, Samsung, Qualcomm, Nokia यासारख्या जागतिक तंत्रज्ञान दिग्गज कंपन्याही सध्या 6G साठी R&D च्या प्रारंभिक टप्प्यात आहेत. अशा वेळी, एका FMCG कंपनीकडून (पतंजली) इतकं अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी असलेला स्मार्टफोन बाजारात आणणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे.

अफवांपासून सावध राहा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. अशा बातम्या अनेकदा केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा जनतेला चुकीच्या दिशेने वळवण्यासाठी बनवल्या जातात. त्यामुळे अशा बातम्यांचं सत्य जाणून घेतल्याशिवाय त्या फॉरवर्ड करू नका.

एकांदरीत काय, ‘पतंजली 6G स्मार्टफोन’ ही बातमी फक्त अफवा आहे. आजही 6G मोबाईल नेटवर्क अस्तित्वात नाही आणि 250MP कॅमेरा व 200W चार्जिंगसारखे फीचर्स घेऊन पतंजलीनं कोणताही फोन लाँच केल्याचं कोणतंही खात्रीलायक पुरावा नाही. स्मार्ट व्हा, अफवांपासून दूर राहा!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.