AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय

उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांसोबत बद्धकोष्ठतेची समस्या देखील खूप सतावत असते. अशावेळेस तुम्ही दररोज एक ग्लास हे पेय प्यायल्याने या समस्या चुटकीसरशी कमी होतील. चला तर मग या पेयाबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

दररोज एक ग्लास 'हे' पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
| Edited By: | Updated on: Apr 03, 2026 | 4:28 PM
Share

उन्हाळा म्हंटल की शरीरातून घाम जास्त येणे , थकवा, डिहाइड्रेशन आणि त्वचेच्या समस्या या व्यतिरिक्त आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी आपण शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्य सुधारणारे घरगुती उपाय करत असतो. अशातच कोरफडीचा ज्यूस पिणे हा एक नैसर्गिक उपाय आहे, जो केवळ शरीराला थंडावा देत नाही, तर त्वचा आणि पोटासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडीचा गर हा पोषक तत्वांनी समृद्ध असतो आणि त्याच्या नियमित सेवनाने शरीर आतून निरोगी आणि उत्साही राहते. चला तर मग आजच्या लेखात आपण मुरूम आणि बद्धकोष्ठतेवर मात करण्यासाठी कोरफडीचा ज्यूस कशाप्रकारे कामं करते ते जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात आरोग्यासाठी कोरफडीचा ज्यूस पिणे फायद्याचे

1. शरीराला थंड करते

कोरफडीच्या गरापासून तयार ज्यूस नैसर्गिकरित्या थंड असतो. उन्हाळ्याच्या उष्णतेत त्याचे सेवन केल्याने शरीराला आतून थंडावा मिळण्यास मदत होते, ज्यामुळे उष्माघात, चक्कर आणि अस्वस्थतेपासून आराम मिळतो.

2. त्वचेला चमकदार बनवते

उन्हाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी किंवा तेलकट होऊ शकते. कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने त्वचेला आतून आर्द्रता आणि पोषण मिळते. तसेच त्याच्या नियमित सेवनाने त्वचा नितळ, मऊ आणि तेजस्वी राहण्यास मदत होते, तसेच मुरुमे आणि डाग कमी होण्यासही मदत होते.

3. पोट स्वच्छ आणि मजबूत ठेवते

उन्हाळ्यात बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त या सामान्य समस्या अनेकांना होत असतात. तर यावर रामबाण उपाय म्हणजे कोरफडीचा ज्यूस पिणे. यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि पोट स्वच्छ राहते. त्याचबरोबर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

4. शरीरात पाण्याची पातळी योग्य राहते

वाढत्या तापमानामुळे शरीरातून जास्त घाम येतो ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू लागते. अशावेळेस तुम्ही कोरफडीचा ज्यूसचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची पातळी टिकवून राहते आणि तहान भागवण्यास मदत होते. तसेच कोरफडीच्या गरातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला ऊर्जा प्रदान करतात.

5. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून उन्हाळ्यातील आजारांशी लढण्यास मदत करतात.

कोरफडीचा ज्यूस कसा बनवायचा?

ताज्या कोरफडीचा गर काढून तो पाण्यात मिसळा. चवीसाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस, मध किंवा काळे मीठ टाकून मिश्रण मिक्स करा. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोरफडीचा ज्यूस पिणे सर्वात फायदेशीर ठरते. बाजारात मिळणारे ज्यूसही पिऊ शकता.

सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे:

कोरफडीचा ज्यूस फायदेशीर असला तरी गर्भवती महिला, लहान मुले किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

कोरफडीचा ज्यूस हा उन्हाळ्यातील एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे, जो शरीराला थंडावा देण्यासोबतच त्वचा आणि पचनक्रिया सुधारतो. याचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश केल्यास तुम्हाला निरोगी आणि ताजेतवाने राहण्यास मदत होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.