AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारळाचं पाणी पिण्याचे आहेत खूपच आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या या 5 गोष्टी

उन्हाळाच्या दिवसांमध्ये आपलं शरीर थंड राहावं, उन्हापासून आणि उष्णतेपासून बचाव व्हावा, यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. मात्र नारळाचं पाणी हा एक असा नैसर्गिक उपाय आहे, जो फक्त तुमची तहानच भागवत नाही तर तुमच्या शरीराला आतून पोषण सुद्धा देतो.

नारळाचं पाणी पिण्याचे आहेत खूपच आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या या 5 गोष्टी
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 04, 2025 | 9:35 PM
Share

उन्हाळाच्या दिवसांमध्ये आपलं शरीर थंड राहावं, उन्हापासून आणि उष्णतेपासून बचाव व्हावा, यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. मात्र नारळाचं पाणी हा एक असा नैसर्गिक उपाय आहे, जो फक्त तुमची तहानच भागवत नाही तर तुमच्या शरीराला आतून पोषण सुद्धा देतो. यामध्ये उपलब्ध असलेले मिनरल्स, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटीऑक्सीडेंट्स तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर करतात. नारळाचं पाणी पचनासाठी हलके आणि शरीरासाठी उत्तम पेय असतं. नारळाच्या पाण्यामुळे वजन देखील वाढत नाही. तुम्हाला जर भूक लागली तर नारळाचं पाणी पेऊ शकतात. यामुळे तुम्हाला काही काळ  बरं वाटेल. जर तुम्हाला उन्हाळ्यात आरोग्यदायी राहायचं असेल तर नारळाचं पाणी अनेक प्रकारे तुमची मदत करू शकते. चला तर जाणून घेऊयात नारळ पाणी पिण्याचे पाच फायदे कोणते आहेत त्याबद्दल

डिहाइड्रेशन पासून सुटका

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला जास्त घाम येतो. त्यामुळे तुमच्या शरीरात असलेलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन तुम्हाला डिहाइड्रेशनचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला थकवा येतो. मात्र नाराळं पाणी यावर एक उत्तम उपाय आहे. नारळाचं पाणी तुमचा थकवा दूर करू शकते.

त्वचेला चमकदार बनवते

नारळाचं पाणी तुमच्या शरीराला आतून हायड्रेट करते, त्यामुळे तुमचा चेहरा चमकदार होतो. चेहऱ्यावर असलेले डाग दूर होतात. नारळाचं पाणी नैसर्गिक पद्धतीनं तुमच्या त्वचेचं आरोग्य वाढवतं

पचन शक्ती सुधारते

नारळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे तुमची पचन शक्ती सुधारते. तुम्हाला ॲसिडिटीपासून मुक्तता मिळते, पोटाला थंडावा देण्याचं काम नारळांच पाणी करत.

वजन कमी करण्यास मदत करते

नारळाच्या पाण्यामुळे तुम्हाला तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही, परिणामी नारळाच्या पाण्यामुळे तुमचं वजन देखील कमी होतं.

किडनीला निरोगी ठेवतं

नारळाचं पाणी तुमच्या किडनीसाठी देखील खूप फायद्याचं आहे. नारळाचं पाणी युरिनच्या माध्यमातून विविध विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करतं, त्यामुळे तुमचं शरीर आरोग्यदायी राहातं.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.