AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kidney Disorder Symptoms | किडनी खराब झाल्याची ही आहेत 5 महत्त्वाची लक्षणे, जाणून घ्या

डनी खराब होत असेल किंवा किडनीला काही इन्फेक्शन असेल तर किडनीकडून शरीराला काही संकेत दिले जातता. हे संकेत वेळीच ओळखले तर ठीक अन्यथा मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया किडनीच्या आजाराची काही लक्षणे

Kidney Disorder Symptoms | किडनी खराब झाल्याची ही आहेत 5 महत्त्वाची लक्षणे, जाणून घ्या
KIDNEYImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 7:08 AM
Share

मुंबई : किडनी हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील टाकाऊ तसेच घातक पदार्थ बाहेर काढण्याचे काम किडनीद्वारे केले जाते. किडनीने आपले काम करणे सोडले किंवा एखाद्या आजारामुळे किडनी पूर्ण क्षमतेने काम करु शकत नसली, तर होणार त्रास हा असह्य होतो. किडनी खराब होत असेल किंवा किडनीला काही इन्फेक्शन असेल तर किडनीकडून शरीराला काही संकेत दिले जातात. हे संकेत वेळीच ओळखले तर ठीक अन्यथा मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया किडनीच्या आजाराची काही लक्षणे.

भूक न लागने, उलटी होणे

युरिया, क्रिएटिनिन, अॅसिड यासारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांना रक्तातून बाहेर काढण्याचे काम किडनीद्वारे केले जाते. किडनीच्या माध्यमातून हे टाकाऊ पदार्थ मुत्राशयात साठवले जातात. नंतर ते लघवीच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकले जातात. मात्र किडनीला काही आजार झाले की खूप त्रास होतो. त्याची काही लक्षणे आहेत. त्यातील सर्वात पहिले लक्षण म्हणजे भूक न लागणे. शरीरात टाकऊ पदार्थ साचल्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. तसेच सकळी उठल्यानंतर मळमळ तसेच उलटी होण्याचा त्रास जाणवू लागतो. भूक न लगाल्यामुळे जेवण करण्याची इच्छा होत नाही, ही किडनीचा आजार असण्याचे लक्षणे आहेत.

पाय तसेच घोट्यांना सूज

किडनी शरीरातील आगावीच्या सोडियमला फिल्टर करण्याचे काम करते. किडनीने काम करणे बंद केल्यानंतर शरीरात सोडियमचे प्रमाण वाढायला लागते. यामुळे पाय, घोटे तसेच पिंढऱ्यांना सूज येते. याला एडिमा म्हणतात. तसं पाहायचं झालं तर किडनीचा आजार असेल तर डोळे तसेच चेहऱ्यावर सूज येते. मात्र काही प्रमाणात हात, पाय तसेच घोट्यावरदेखील सूज आलेली दिसते.

कोरडी त्वचा तसेच खाज

त्वचा कोकडी होणे तसेच खाज येणे हे किडनी डिसऑर्डचे मुख्य संकेत आहेत. किडनी रक्तातील नको असलेले घटक फिल्टर करण्यास सक्षम नसेल तेव्हा त्वचेवर खाज येणे तसेच त्वचा कोरडी पडणे अशी लक्षणे जाणवतात.

कमजोरी तसेच थकवा

थकवा तसेच कमजोर झाल्यासारखे वाटणे हे किडनीचा आजार सुरु झाल्याचे संकेत आहेत. नंतर किडनीचे आजार वाढल्यानंतर आणखी थकवा तसेच शरीर कमजोर झाल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे चालतानादेखील थकवा जाणवतो.

पुन्हा पुन्हा लघवी येणे

एका निरोगी व्यक्तीला दिवसातून सहा ते दहा वेळा लघवी येते. यापेक्षा जास्त वेळ लघवी येत असेल तर किडनीचा आजार झाल्याची शक्यता असते. किडनीचा आजार असलेल्या व्यक्तीला एक तर पुन्हा पुन्हा लघवीला जावे वाटते किंवा लघवीला जाण्याची एखाद्या व्यक्तीचा इच्छा होत नाही. काही लोकांच्या लघवीतून रक्तसुद्धा यायला लागते. किडनी खराब असण्याची ही काही मुख्य लक्षणे आहेत.

इतर बातम्या :

Jujube Fruit | कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे ? चिंतो नको फक्त बोर खा !

Lips Care : हे होममेड लिप स्क्रब ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल!

Skin Care : या गोष्टी कॉफीसोबत चुकूनही घेऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली