AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीत मीठ जास्त झालंय? अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त पिठाचे गोळे करा अन् जादू पाहा!

स्वयंपाक करताना भाजीत मीठ जास्त पडले असल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. या सोप्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही भाजीची चव पुन्हा पूर्ववत करू शकता, जाणून घ्या सविस्तर बातमी.

भाजीत मीठ जास्त झालंय? अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त पिठाचे गोळे करा अन् जादू पाहा!
salt
| Updated on: Jan 20, 2026 | 6:44 PM
Share

एखादी गृहिणी असो किंवा नवीन स्वयंपाक शिकणारा एखाद्या व्यक्ती… अनेकदा घाईघाईत किंवा अंदाज चुकल्यामुळे प्रत्येकाच्या हातून भाजीत मीठ जास्त पडते. मीठ जास्त झाले की संपूर्ण जेवणाची चव बिघडते. यामुळे संपूर्ण मेहनतीवर पाणी पडते. मात्र, अशा वेळी भाजी फेकून न देता किंवा टेन्शनमध्ये न येता स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून तुम्ही मिठाचा खारटपणा सहज कमी करु शकता.

1. कणकेच्या गोळ्यांचा वापर: जर रस्सा भाजी किंवा आमटीमध्ये मीठ जास्त झाले असेल, तर गव्हाच्या पिठाचे (कणकेचे) छोटे छोटे ३-४ गोळे करुन भाजीत टाका. साधारण १० ते १५ मिनिटे हे गोळे भाजीत राहू द्यावेत. पीठ अतिरिक्त मीठ शोषून घेते. जेवण वाढण्यापूर्वी हे गोळे काढून टाका.

2. उकडलेला बटाटा: बटाटा हा मिठाचा उत्तम शोषक मानला जातो. भाजीत मीठ जास्त झाल्यास कच्च्या बटाट्याच्या फोडी किंवा उकडलेला बटाटा मॅश करून टाकावा. १० मिनिटांनंतर हे बटाटे जास्तीचे मीठ काढून टाकण्यास मदत करतात.

3. लिंबाचा रस आणि साखर: जर मीठ थोडेसे जास्त झाले असेल, तर त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर साखर घालावी. लिंबाचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा मिठाच्या तिखट चवीला न्यूट्रलाईज (Neutralize) करतो.

4. भाजलेले बेसन: सुकी भाजी किंवा कडधान्यांच्या भाजीत मीठ जास्त झाले असल्यास, थोडे बेसन कोरडे भाजून त्यात मिसळावे. यामुळे भाजीला छान बाइंडिंग येते. तसेच खारटपणाही कमी होतो.

5. साय किंवा दुधाचा वापर: पनीरची भाजी किंवा कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात थोडे दूध किंवा दुधावरची साय फेटून टाकावी. यामुळे ग्रेव्हीची चव सुधारते. त्यासोबतच मिठाचे प्रमाणही योग्य होते.

6. ब्रेडचा वापर : जर रस्सा भाजीमध्ये मीठ खूपच जास्त झाले असेल, तर पांढऱ्या ब्रेडचे १-२ तुकडे भाजीत टाका. ब्रेड खारट पाणी वेगाने शोषून घेतो. साधारण २-३ मिनिटांनंतर ब्रेड मऊ होऊन तुटण्यापूर्वी तो काळजीपूर्वक बाहेर काढावा. रस्सा भाजीसाठी हा एक अत्यंत जलद उपाय आहे.

7. भाजलेला कांदा : जर मसाला ग्रेव्ही किंवा चिकन-मटण रस्स्यात मीठ जास्त झाले असेल, तर कांदा कापून तो तेलात चांगला लाल होईपर्यंत तळा. त्याची पेस्ट करून भाजीत मिसळा. कांद्याचा गोडसरपणा मिठाची तीव्रता कमी करतो. तसेच भाजीची ग्रेव्ही देखील दाट होते.

Follow Us
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.