AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीत मीठ जास्त झालंय? अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त पिठाचे गोळे करा अन् जादू पाहा!

स्वयंपाक करताना भाजीत मीठ जास्त पडले असल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. या सोप्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही भाजीची चव पुन्हा पूर्ववत करू शकता, जाणून घ्या सविस्तर बातमी.

भाजीत मीठ जास्त झालंय? अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त पिठाचे गोळे करा अन् जादू पाहा!
salt
| Updated on: Jan 20, 2026 | 6:44 PM
Share

एखादी गृहिणी असो किंवा नवीन स्वयंपाक शिकणारा एखाद्या व्यक्ती… अनेकदा घाईघाईत किंवा अंदाज चुकल्यामुळे प्रत्येकाच्या हातून भाजीत मीठ जास्त पडते. मीठ जास्त झाले की संपूर्ण जेवणाची चव बिघडते. यामुळे संपूर्ण मेहनतीवर पाणी पडते. मात्र, अशा वेळी भाजी फेकून न देता किंवा टेन्शनमध्ये न येता स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून तुम्ही मिठाचा खारटपणा सहज कमी करु शकता.

1. कणकेच्या गोळ्यांचा वापर: जर रस्सा भाजी किंवा आमटीमध्ये मीठ जास्त झाले असेल, तर गव्हाच्या पिठाचे (कणकेचे) छोटे छोटे ३-४ गोळे करुन भाजीत टाका. साधारण १० ते १५ मिनिटे हे गोळे भाजीत राहू द्यावेत. पीठ अतिरिक्त मीठ शोषून घेते. जेवण वाढण्यापूर्वी हे गोळे काढून टाका.

2. उकडलेला बटाटा: बटाटा हा मिठाचा उत्तम शोषक मानला जातो. भाजीत मीठ जास्त झाल्यास कच्च्या बटाट्याच्या फोडी किंवा उकडलेला बटाटा मॅश करून टाकावा. १० मिनिटांनंतर हे बटाटे जास्तीचे मीठ काढून टाकण्यास मदत करतात.

3. लिंबाचा रस आणि साखर: जर मीठ थोडेसे जास्त झाले असेल, तर त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर साखर घालावी. लिंबाचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा मिठाच्या तिखट चवीला न्यूट्रलाईज (Neutralize) करतो.

4. भाजलेले बेसन: सुकी भाजी किंवा कडधान्यांच्या भाजीत मीठ जास्त झाले असल्यास, थोडे बेसन कोरडे भाजून त्यात मिसळावे. यामुळे भाजीला छान बाइंडिंग येते. तसेच खारटपणाही कमी होतो.

5. साय किंवा दुधाचा वापर: पनीरची भाजी किंवा कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात थोडे दूध किंवा दुधावरची साय फेटून टाकावी. यामुळे ग्रेव्हीची चव सुधारते. त्यासोबतच मिठाचे प्रमाणही योग्य होते.

6. ब्रेडचा वापर : जर रस्सा भाजीमध्ये मीठ खूपच जास्त झाले असेल, तर पांढऱ्या ब्रेडचे १-२ तुकडे भाजीत टाका. ब्रेड खारट पाणी वेगाने शोषून घेतो. साधारण २-३ मिनिटांनंतर ब्रेड मऊ होऊन तुटण्यापूर्वी तो काळजीपूर्वक बाहेर काढावा. रस्सा भाजीसाठी हा एक अत्यंत जलद उपाय आहे.

7. भाजलेला कांदा : जर मसाला ग्रेव्ही किंवा चिकन-मटण रस्स्यात मीठ जास्त झाले असेल, तर कांदा कापून तो तेलात चांगला लाल होईपर्यंत तळा. त्याची पेस्ट करून भाजीत मिसळा. कांद्याचा गोडसरपणा मिठाची तीव्रता कमी करतो. तसेच भाजीची ग्रेव्ही देखील दाट होते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.