AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Food | चविष्ट अळूच्या पानांचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरेल वरदान!

हृदयाच्या आकाराच्या अरबीच्या पानांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. भारतीय घरांमध्ये भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात.

Healthy Food | चविष्ट अळूच्या पानांचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरेल वरदान!
अळूची पाने
| Updated on: Feb 12, 2021 | 4:39 PM
Share

मुंबई : हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यापैकी एक ‘अरबी पाने’ अर्थात ‘अळूची पाने’ ही एक अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. हृदयाच्या आकाराच्या अरबीच्या पानांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. भारतीय घरांमध्ये भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात. त्याच्या अनोख्या चवीमुळे अरबीच्या पानांचा भजी बनवण्यासाठी देखील वापर केला जातो (Health benefits of Taro leaves aka aluchi pane).

अरबी अर्थात अळूचे पिक उपोष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात घेतले जाते. शरीराचे विविध विकार दूर करण्यासाठी याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. एकंदरीत आरोग्य सुधारण्यास हे फायदेशीर ठरते. चला आरोग्यासाठी अरबीच्या पानांचे फायदे जाणून घेऊया…

हृदय निरोगी ठेवते

हृदय शरीराच्या इतर अवयवांकडे रक्त पुरवठा करते. परंतु, जेव्हा चरबी जमा झाल्यामुळे या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, तेव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाह थांबतो. हे टाळण्यासाठी अरबी पाने खूप फायदेशीर असतात. या पानांत नायट्रेट असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

उच्च रक्तदाब नियंत्रित करते

उच्च रक्तदाब ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात अरबी पानांचा नियमित समावेश केला पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. अरबीचे पान नियमितपणे खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.

दृष्टी सुधारते

या पानांमध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. त्यात आढळणारी बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. अरबीची पाने खाल्ल्याने दृष्टी वाढते. अरबी पानांमध्ये व्हिटामिन ए देखील आढळतो, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे (Health benefits of Taro leaves aka aluchi pane).

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

मधुमेह असलेल्या लोकांसाठी अरबी पाने फायदेशीर ठरतात. जीवनशैलीतील सुधारणेसह, दररोज अरबी पाने सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित केली जाते. यात प्रतिरोधक स्टार्च असतो, जो सहजपणे शरीरात शोषला जात नाही.

वजन कमी होते

लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या आहे. जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होते. अरबी पानांमध्ये फारच कमी कॅलरी आढळतात. यात आहारातील फायबर देखील असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. विविध गुणांनी समृद्ध असल्याने, अरबी पाने शरीराच्या अनेक विकारांवर विजय मिळविण्यास मदत करतात. हे केवळ रक्तातील साखर नियंत्रित करतेच, परंतु डोळ्यांची दृष्टी देखील वाढवते.

आयर्नची झीज भरून निघते.

रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अ‍ॅनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of Taro leaves aka aluchi pane)

हेही वाचा :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.