AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदाम-मनुके, अंजीर… कोणते ड्रायफ्रुट किती तास भिजवावे? खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Dry Fruits : अनेक लोक आहारात ड्रायफ्रुटचा समावेश करतात. यामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते. कोणते ड्रायफ्रुट पाण्यात किती वेळ भिजवावे हे जाणून घेऊयात.

बदाम-मनुके, अंजीर... कोणते ड्रायफ्रुट किती तास भिजवावे? खाण्याची योग्य पद्धत कोणती?
Dry FruitsImage Credit source: Google
| Updated on: Feb 21, 2026 | 10:08 PM
Share

शरीर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. फक्त भाज्या, धान्ये किंवा फळे खाल्यामुळे आरोग्य निरोगी राहते असे नाही. तुमच्या आहारात नेहमीच्या अन्नापेक्षा इतरही अन्न सामील करणे गरजेचे आहे. यामुळे अनेक लोक आहारात ड्रायफ्रुटचा समावेश करतात. यामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते. काजू, बदाम, मनुके, पिस्ता, अंजीर अशा प्रत्येक ड्रायफ्रुटचे फायदे आणि ते खाण्याची पद्धत वेगवेगळी आहे. यातील काही ड्रायफ्रुट भिजवून खाल्ले जातात. कोणते ड्रायफ्रुट किती वेळ भिजवणे फायदेशीर असते ते जाणून घेऊयात.

बदाम कसे खावेत?

आहारात बदामाचा समावेश केल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते, त्वचेला चमकदार बनते आणि अस्वस्थ इच्छा नियंत्रित होण्यास मदत होते. बदाम खाण्यापूर्वी 8 ते 12 तास पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यानंतर सकाळी ते सोलून रिकाम्या पोटी खावेत. वयानुसार किती बदाम खावेत हे देखील ठरलेले आहे. जर तुम्ही तरुण असाल तर तुम्ही 5 ते 7 बदाम खाऊ शकता. मात्र तुमची पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर तुम्ही त्यापेक्षा कमी बदाम खाऊ शकता.

अक्रोड कसे खावेत?

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे तुमच्या मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर असतात. यामुळे झोप सुधारण्यास मदत होते. अक्रोड खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्ता ही आहे. अक्रोड 4 ते 6 तास भिजवून ठेवा आणि दररोज 1 ते 2 अक्रोड खाणे पुरेसे आहे.

काजू कसे खावेत?

काजू खाल्ल्याने तुमची ऊर्जा वाढते आणि मूड चांगला राहतो. काजूला भिजवण्याची गरज नाही. मात्र तुम्हाला ते कोरडे खायचे नसतील तर ते 1 ते 2 तास भिजवू शकतो. तुम्ही दररोज 2 काजू खाणे खूप फायदेशीर ठरेल.

पिस्ता भिजवून खावा का?

पिस्ता असे ड्रायफ्रुट आहे जे भिजवण्याची आवश्यकता नाही. पिस्ता तुम्ही तसेच खाऊ शकता. यात जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि साखरेची पातळी नियंत्रित होते. तुम्ही पिस्ता दुपारचा नाश्त्या म्हणून खाऊ शकता. दररोज 4 ते 5 पिस्ते खाऊ शकता.

मनुके कसे खावे?

मनुके हे लोहाचे स्रोत आहेत. ते तुमचे हिमोग्लोबिन वाढवण्यास, त्वचेचे आरोग्य राखण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. मनुके 3 ते 4 तास भिजवून सकाळी खा. दररोज 6 ते 8 मनुके पुरेसे आहेत.

खजूर

खजूर हे एक उत्कृष्ट ऊर्जा वाढवणारे ड्रायफ्रुट आहे. तुम्ही दररोज 1 ते 2 खजूर खाऊ शकता. व्यायामापूर्वी खजूर खाल्याने त्वरित ऊर्जा मिळते. हे आतड्यांसाठी फायदेशीर आहे. तसेच खजूर रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. खजूर खाण्यापूर्वी भिजवण्याची गरज नाही.

अंजीर कसे खावे

ड्राय अंजीर खाण्यापूर्वी ते भिजवणे गरजेचे आहे. अंजीर फक्त 3 ते 4 तास भिजवणे गरजेचे आहे. दररोज 1 ते 2 तुकडे खाणे पुरेसे आहे. यामुळे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी देखील फायदेशीर मानले जातात. तुम्ही अंजीर दररोज सकाळी खाऊ शकता.

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.