AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walking Benefits : दिवसभरात किती वेळ चालणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला…

Benefits of Walking: आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि जंक फूडच्या अतिसेवनामुळे तुम्हाला अनेक समस्या होतात. वजन कमी करण्यासाठी पोषक आहार आणि योग्य व्यायाम करणे गरजेचे असते. तज्ञांनुसार सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ चालल्यामुळे तुमचे वजन तर कमी होतेच त्यासोबतच तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Walking Benefits : दिवसभरात किती वेळ चालणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला...
दिवसभरात किती वेळ चालणे आरोग्यासाठी फायदेशीर?
| Edited By: | Updated on: Jan 29, 2025 | 4:45 PM
Share

निरोगी आरोग्यासाठी योग्य पोषक आहार आणि शरीराला व्यायामाची सवय असणे गरजेचे असते. तुमच्या आराहामध्ये पोषक आहाराचे समावेश केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार होत नाहीत. आहारासह योग्य व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होते. अनेकांना सकाळी उठल्यावर किंवा रात्री जेवल्यानंतर चालण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञांनुसार, दिवसभरामध्ये तुम्ही 40 ते 45 मिनिटे चालल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. चालल्यामुळे फक्त तुमचे वजन कमी होत नाही तर तुमच्या शरीरातील अनेक स्नायूंची क्रिया होते.

चालल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्योसबतच जेवल्यानंतर 20 मिनिटे चालल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरेग्या निरोगी राहाण्यास मदत होते. अनेकांना प्रश्न पडला असेल की दिवसभरामध्ये नेमकं किती वेळ चालणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया दिवसभरामध्ये नेमकं किती वेळ चालणे फायदेशीर असते त्यासोबतच चालण्याचे तुमच्या आरोग्याला नेमकं काय फायदे होतात.

दिवसभरात किती चालले पाहिजे?

तज्ञांच्या मते, दररोज सकाळी 8 ते 10 किलोमीटर चालल्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आव्हालानुसार, तुम्ही आठवड्यातून किमान 150 मिनिटे म्हणजेच दररोज सुमारे 30 मिनिटे चालल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुम्ही दररोज र 8 ते 10 किलोमीटर चालल्यामुळे तुमचे वजन तर कमी होतेच त्यासोबतच तुमच्या शरीरातील चयापचय मजबूत होण्यास मदत होते. चालल्यामुळे तुम्हाला जर गढगे दुखीच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

कोणत्या वयात किती चालावे?

रिपोर्ट्सनुसार, 6 ते 17 वर्षाच्या मुलांनी दररोज किमान 60 मिनिटे चालणे किंवा मैदानी खेळ खेळणे अपेक्षित असते. त्यासोबतच दिवसभरामध्ये 15000 पावले लहान मुलांसाठी फायदेशीर ठेरते. 18 ते 40 वर्षाच्या व्यक्तींनी दिवसभरामध्ये किमान 12000 पावले चालणे अपेक्षित असते. तर 40 ते 60 वर्षांच्या लोकांनी दिवसभरात 4000-500 पावले चालणे फायदेशीर ठरेल. सुरूवातीला तुम्ही दिवसभरामध्ये 20 ते 30 मिनिटे म्हणजेच 2 ते 4 किलोमीटर चालणे अपेक्षित असते.

चालण्याचे आरोग्यदायी फायदे :

चालण्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. दररोज सकाळी लवकर उठून चालल्यामुळे तुमच्या शरीरातील अवयवांची हालचाल होते त्यासोबतच तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुम्हाला जर अॅसिडिटीचा त्रास असेल तर सकाळी जिऱ्याचे पाणी पिऊन किमान २० मिनिटे चालल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात. चालल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहाते त्यासोबतच तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी चालल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते त्योसोबतच वजन कमी होण्यास मदत होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.