AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदेव बाबांनी मधुमेहावर सांगितला रामबाण उपाय, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर

भारतात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतातील प्रत्येक घरात किमान एक तरी मधुमेहाचा रुग्ण आढळतो. पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी मधुमेहावर रामबाण उपाय सांगितला आहे.

रामदेव बाबांनी मधुमेहावर सांगितला रामबाण उपाय, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर
Baba Ramdev
| Updated on: Aug 30, 2025 | 6:43 PM
Share

भारतात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी असेही म्हटले जाते. भारतातील प्रत्येक घरात किमान एक तरी मधुमेहाचा रुग्ण आढळतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे हा आजार अनुवंशिक आहे. जर एखाद्या घरात मधुमेहाचा रूग्ण असेल तर पुढच्या पिढीलाही मधुमेहाचा त्रास जाणवतो. याला मधुमेह 1 म्हणतात. तर खराब खाद्य आणि लठ्ठपणा या मुळे मधुमेह 2 होऊ शकतो.

मधुमेह हा असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र तो नियंत्रणात ठेवता येतो. यासाठी योग्य आहार आणि औषधे घेणे गरजेचे आहे. पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मधुमेह या आजारावर नियंत्रण कसे ठेवायचे याबाबत माहिती दिली आहे.

जांभूळ आणि त्याच्या बिया

योगगुरू रामदेव बाबा यांनी आपल्या व्हिडिओमध्ये जाभूळ आणि त्याच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशर असल्याचे म्हटले आहे. जांभूळ हे पचनासाठी चांगले असते, तसेच ते या स्वादुपिंडाच्या बीटा पेशी सक्रिय करण्यास मदत करते. ज्यामुळे इन्सुलिन तयार होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.

View this post on Instagram

A post shared by Swami Ramdev (@swaamiramdev)

सेवन कसे करायचे?

रामदेव बाबा यांनी म्हटले की, मधुमेहाचे रुग्ण जाभूळ थेट खाऊ शकतात. याचा फायदा होतो, मात्र जांभळाच्या बिया जास्त फायदेशीर असतात. या बियांची पावडर बनवून ती खाल्यास आरोग्याला फायदा होतो. यासाठी जांभळाच्या बिया चांगल्या प्रकारे धुवा. त्यानंतर त्या उन्हात वाळवा. त्यानंतर एक कारले घ्या आणि त्याचे लहान तुकडे करू तेही उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. बिया आणि कारले वाळवल्यानंतर, काळे जिरे, चिरईता आणि कुटकी चांगले वाळवा. या सर्व गोष्टी एकत्र करुन बारीक करा आणि पावडर बववा.

या पावडरच्या सेवनामुळे स्वादुपिंड सक्रिय होते. तसेच आहारात काही बदल करून आणि दररोज व्यायाम करून मधुमेह नियंत्रित करता येतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारल्याचा आणि आवळ्याचा रस देखील फायदेशीर असतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतरही घरगुती उपाय आहेत. मात्र कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी, तुम्ही तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.