AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदेव बाबांनी मधुमेहावर सांगितला रामबाण उपाय, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर

भारतात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतातील प्रत्येक घरात किमान एक तरी मधुमेहाचा रुग्ण आढळतो. पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी मधुमेहावर रामबाण उपाय सांगितला आहे.

रामदेव बाबांनी मधुमेहावर सांगितला रामबाण उपाय, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर
Baba Ramdev
| Updated on: Aug 30, 2025 | 6:43 PM
Share

भारतात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी असेही म्हटले जाते. भारतातील प्रत्येक घरात किमान एक तरी मधुमेहाचा रुग्ण आढळतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे हा आजार अनुवंशिक आहे. जर एखाद्या घरात मधुमेहाचा रूग्ण असेल तर पुढच्या पिढीलाही मधुमेहाचा त्रास जाणवतो. याला मधुमेह 1 म्हणतात. तर खराब खाद्य आणि लठ्ठपणा या मुळे मधुमेह 2 होऊ शकतो.

मधुमेह हा असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र तो नियंत्रणात ठेवता येतो. यासाठी योग्य आहार आणि औषधे घेणे गरजेचे आहे. पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मधुमेह या आजारावर नियंत्रण कसे ठेवायचे याबाबत माहिती दिली आहे.

जांभूळ आणि त्याच्या बिया

योगगुरू रामदेव बाबा यांनी आपल्या व्हिडिओमध्ये जाभूळ आणि त्याच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशर असल्याचे म्हटले आहे. जांभूळ हे पचनासाठी चांगले असते, तसेच ते या स्वादुपिंडाच्या बीटा पेशी सक्रिय करण्यास मदत करते. ज्यामुळे इन्सुलिन तयार होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.

View this post on Instagram

A post shared by Swami Ramdev (@swaamiramdev)

सेवन कसे करायचे?

रामदेव बाबा यांनी म्हटले की, मधुमेहाचे रुग्ण जाभूळ थेट खाऊ शकतात. याचा फायदा होतो, मात्र जांभळाच्या बिया जास्त फायदेशीर असतात. या बियांची पावडर बनवून ती खाल्यास आरोग्याला फायदा होतो. यासाठी जांभळाच्या बिया चांगल्या प्रकारे धुवा. त्यानंतर त्या उन्हात वाळवा. त्यानंतर एक कारले घ्या आणि त्याचे लहान तुकडे करू तेही उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. बिया आणि कारले वाळवल्यानंतर, काळे जिरे, चिरईता आणि कुटकी चांगले वाळवा. या सर्व गोष्टी एकत्र करुन बारीक करा आणि पावडर बववा.

या पावडरच्या सेवनामुळे स्वादुपिंड सक्रिय होते. तसेच आहारात काही बदल करून आणि दररोज व्यायाम करून मधुमेह नियंत्रित करता येतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारल्याचा आणि आवळ्याचा रस देखील फायदेशीर असतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतरही घरगुती उपाय आहेत. मात्र कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी, तुम्ही तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.