AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबे खरेदी करताय? या टिप्स करा फॉलो, ओळखा कृत्रिम आणि नैसर्गिक आंब्यांमधील फरक

आजकाल कृत्रिमरित्या आंबा पिकविण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. शेवटी कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा हा मोठा प्रश्न आहे. पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला योग्य आंबा ओळखण्यास मदत होईल.

आंबे खरेदी करताय? या टिप्स करा फॉलो, ओळखा कृत्रिम आणि नैसर्गिक आंब्यांमधील फरक
mango season
| Updated on: May 17, 2023 | 3:41 PM
Share

मुंबई: उन्हाळा म्हणजे आंबा खाण्याचा आनंद घेणे. आंब्याची आवड नसलेला क्वचितच कोणी असेल. मात्र आजकाल कृत्रिमरित्या आंबा पिकविण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. शेवटी कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा हा मोठा प्रश्न आहे. पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला योग्य आंबा ओळखण्यास मदत होईल. फळे पिकविण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी रसायने किंवा इतर पद्धती वापरल्या जातात. हे बरेचदा मागणी पूर्ण करण्यासाठी किंवा फळांचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी केले जाते. या प्रक्रियेत वापरली जाणारी अनेक रसायने हानिकारक असू शकतात आणि दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

  1. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा रंग एकसमान असतो आणि नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यापेक्षा जास्त पिवळा किंवा केशरी दिसू शकतो. पिकण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे त्यांचे थोडे चमकदार स्वरूप देखील असू शकते.
  2. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याला गोड, फळांसारखा वास असतो, तर कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याला रसायने किंवा वेगळा वास असू शकतो. जर आंब्याला विचित्र किंवा खराब वास आला असेल तर तो कृत्रिमरित्या पिकविलेला आंबा असू शकतो.
  3. कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यापेक्षा अधिक मऊ वाटू शकतात. कारण पिकण्याच्या प्रक्रियेत वापरली जाणारी रसायने फळांमधील पेशींची भिंत तोडून त्यांना मऊ बनवू शकतात.
  4. रसायनांच्या वापरामुळे कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचे बाह्य नुकसान होऊ शकते – जसे की स्क्रॅच किंवा डाग. नैसर्गिक आंब्यात या प्रकारचा बाह्य दोष असण्याची शक्यता कमी असते.
  5. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याच्या गोड आणि चवदार चवीच्या तुलनेत कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याची चव सौम्य किंवा विचित्र असू शकते. जर आंब्याची चव खराब असेल तर तो कृत्रिमरित्या पिकवलेला असू शकतो.

आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आंबे खरेदी कराल तेव्हा या टिप्स चा वापर करून तुम्ही खऱ्या अर्थाने नैसर्गिक आंबे खरेदी करू शकाल याची खात्री करून घ्या.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.