AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवामानात बदल, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास…

भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील तापमानात सातत्याने चढउतार आपल्याला बघायला मिळेल. कधी उकाडा तर कधी थंडी अशी स्थिती कायम असेल.

हवामानात बदल, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास...
weather
| Updated on: Feb 19, 2026 | 7:52 AM
Share

राज्यातील हवामानात सातत्याने चढउतार बघायला मिळत आहे. याचा थेट आरोग्यावर परिणाम होत असून कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस हवामानात सतत बदल राहतील. उकाडा अधिक जाणवेल. 1 जानेवारी 2026 रोजी राज्यासह देशातील अनेक भागात मोठा पाऊस झाला. या अवकाळी पावसानंतर राज्यातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. आता राज्यातून जवळपास थंडी गायब झाली आहे. सकाळच्या वेळी थोड्या प्रमाणात गारवा जाणवतो पण दिवसभर उष्णता जाणवते. थंडी कमी झाली आणि उन्हाचा चटका जाणवत असला तरीही वायू प्रदूषण अजून काही कमी झाले नाही. वायू प्रदूषण सातत्याने वाढताना दिसत आहे. मुंबईतील वायू प्रदूषण हा अत्यंत गंभीर मुद्दा बनले आहे.

उन्हाचा चटका वाढला असला तरीही राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण राहिल. आज राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ होईल. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे 13.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ब्रह्यपुरी येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरी येथे 35.7 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

उत्तर प्रदेशच्या बांदा येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. बांदा येथे 8.2 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. देशातील उच्चांकी तापमानाची नोंद केरळ येथे झाली असून केरळ येथे 36.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मात्र, थंडी बऱ्यापैकी गायब झाली असली तरीही अजून पावसाचे संकट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, जम्मू आणि कश्मीरमधील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यासोबतच दिल्लीसह मुंबईतही प्रदूषण वाढताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांचा विचार करता दिल्लीतील प्रदूषण बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण मुंबईतील प्रदूषणात सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे.

Follow Us
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला.....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन.
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात....
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय...
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय....
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री...
विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री....
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA...
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA....
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने...
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने....
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या..
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प....