AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी दूध की पाणी? काय टाकायचं? 99 टक्के लोकांना माहित नसेल चहा बनवण्याची योग्य पद्धत

अनेकांची सकाळ ही चहाशिवाय सुरु होत नाही. पण अनेकांना चहा हा योग्य पद्धतीने कसा बनवावा हे माहित नाही. कारण चहा बनवताना आधी दूध टाकायचं की पाणी यामध्ये अनेकांना गोंधळ होतो. चला जाणून घेऊयात.

आधी दूध की पाणी? काय टाकायचं? 99 टक्के लोकांना माहित नसेल चहा बनवण्याची योग्य पद्धत
How to make perfect teaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2025 | 8:28 PM
Share

आपल्यापैकी बहुतेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे आवडते. भारतात चहा हा फक्त गरम पेयाचा कप नसून सर्वांच्या मनाजवळचं पेय आहे. कारण सकाळी एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्र हा रोजचा दिनक्रम बनला आहे. घर असो वा ऑफिस, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचे असते तेव्हा लोक अनेकदा चहावर चर्चा करतात.किंवा काम करून थकवा आला असल्यास आपल्याला फ्रेश होण्यासाठी एक कप चहाच आठवतो. पण बऱ्याच जणांना हे माहित नसेल की चहा योग्य पद्धतीने बनवायचा कसा? म्हणजे चहा बनवताना आधी दूध घालाव की पाणी याबाबत एक गोंधळ असतो. चला जाणून घेऊयात.

चहा बनवण्याची योग्य पद्धत

चहा बनवण्यासाठी काहीजण दूध घालतात. म्हणजे थेट दुधातच चहा करतात. पण तसे करणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्यामुळे चहा बनवताना आधी दूध नाही तर पाणी घ्यावे. मग पुढील कृती करावी.

कृती

कच्चे दूध असल्यास:  सर्वप्रथम एका पॅनमध्ये 2 कप पाणी घ्या. चहाच्या कपाप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकतो. एका कप चहासाठी अर्धा चमचा चहापत्ती वापरता येईल. जर कच्चे दूध वापरणार असाल तर सर्वप्रथम, पाणी थोडे गरम करा, मग त्यात दूध घाला ते एक मिनिटांपर्यंत चांगले उकळवू द्या. त्यानंतर त्यात चहापत्ती घाला. अशा प्रकारे, चहामध्ये कच्चेपणाची चव राहणार नाही. आणि कोणत्याही कारणास्तव दूध फाटणार नाही.

तापवलेले दूध:  जर दूध आधीच तापवलेलं असेल तर प्रथम पाणी उकळवा आणि नंतर चहापत्ती घाला. काहीवेळाने मग त्यात दूध घाला आणि त्यानंतर चहा चांगला उखळू द्या. साखर टाकण्यासंदर्भात तुम्ही ठरवू शकता. कारण ती प्रत्येकाच्या चवीप्रमाणे असते. आणि साखर विरघळण्यास जास्त वेळही लागत नाही, म्हणून तुम्ही ती कधीही घालू शकता.

चहा किती मिनिटे उकळणे योग्य?

चहाला योग्य चव देण्यासाठी, तो कमीत कमी 5 ते 6 मिनिटे उकळवा. यामुळे चहा कच्चा वाटणार नाही आणि त्याला चांगली चवही येईल.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.