Summer Foods : उन्हाळ्यात डायटमध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा, मिळवा भरपूर फायदे

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, असे म्हटले जाते ते उगाच नव्हे. या वातावरणात उपाय म्हणून काही खातानाही बरीच काळजी घ्यावी लागते.

Summer Foods : उन्हाळ्यात डायटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश करा, मिळवा भरपूर फायदे
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 8:25 AM

मुंबई : आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, असे म्हटले जाते ते उगाच नव्हे. या वातावरणात उपाय म्हणून काही खातानाही बरीच काळजी घ्यावी लागते. अनेक फळे खाऊन आपणाला उकाड्यापासून आराम मिळवता येतो. पण ते फळ किती आरोग्यदायी आहे हे आपण आधी जाणून घ्यायला हवे. उन्हाळ्याचा हंगामात त्वचेची आणि शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. (Include this in your summer diet)

-कलिंगड हे उन्हाळ्याचे फळ आहे जे फक्त खायलाच नाही तर आपल्या शरीरास हायड्रेटदेखील करते. उन्हाळ्यात उपलब्ध असलेले हे फळ आपल्या शरीराला केवळ आवश्यक पोषक आहार देत नाही तर पाण्याचे अभाव देखील पूर्ण करते. याशिवाय अनेक आजारांमध्येही कलिंगड प्रभावी आहे. कलिंगड खाल्ल्याने तुमचे हृदय मजबूत राहते. तसेच तुमचे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही. याशिवाय आपल्या शरीरात रक्ताची कमतरता देखील संपते.

-नारळ पाणी पिणे देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पोटातील सर्व प्रकारच्या आजारापासून आपले संरक्षण करण्यासाठी आणि आपल्याला थंड ठेवण्याचे कार्य नारळ पाणी करते. म्हणूनच, या हंगामात आपण नारळाच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे.

-काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. म्हणूनच काकडी खाल्ल्याने मधुमेहावरही नियंत्रण मिळते. म्हणून उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.

-दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी पोषक तत्वे असतात. जर आपण सौंदर्याबद्दल बोलत असाल तर चेहऱ्यावर दही वापरल्यास सनबर्न, टॅनिंग, मुरुम, डाग आणि कोरडे त्वचा आणि सुरकुत्या दूर होतात. दही थंड आहे, ज्यामुळे ते गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्तता देते तसेच पचनक्रिया सुधारते, तोंडाचे अल्सर बरे करण्यास, पोटाची उष्णता कमी करणे, वजन कमी करणे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही दही मदत करते.

-उन्हाळ्यात जास्तीत जास्त भाज्या खाणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. यामुळे आपले शरीर थंड आणि शरीरात पाण्याची कमतरता कधीच होत नाही.

संबंधित बातम्या : 

(Include this in your summer diet)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.