AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Right Time To Eat Fruits : तुम्हीही रात्री फळे खाण्याची चूक तर करत नाही ना, जाणून घ्या याबद्दल!

फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फळे आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम अन्न मानली जातात. फळांमध्ये ते सर्व आवश्यक घटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. जरी एखादी व्यक्ती फक्त फळे खात असल तरी ती अनेक दिवस जगू शकतो.

Right Time To Eat Fruits : तुम्हीही रात्री फळे खाण्याची चूक तर करत नाही ना, जाणून घ्या याबद्दल!
आरोग्य
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 4:38 PM
Share

मुंबई : फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फळे आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम अन्न मानली जातात. फळांमध्ये ते सर्व आवश्यक घटक आढळतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. जरी एखादी व्यक्ती फक्त फळे खात असल तरी ती अनेक दिवस जगू शकतो. पूर्वीच्या काळातही बरेचजण फक्त फळे खाऊन जगत होते. (Eating fruit at night is harmful to health)

जरी फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी देखील फळे खाण्याची एक निश्चित वेळ असते. त्याबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे. काही लोक सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री कधीही फळे खातात. पण आयुर्वेदानुसार जर तुम्हाला फळाचा पुरेपूर लाभ घ्यायचा असेल तर सूर्यास्तानंतर ते खाऊ नका. यासाठी योग्य वेळ कोणती असावी हे जाणून घ्या.

सूर्यास्तानंतर फळे खाणे टाळा

आयुर्वेदानुसार, सूर्यास्तानंतर कोणतेही फळ खाल्ल्याने शरीराला फायदा होत नाही, तर ते नुकसान करते. याचे कारण असे आहे की सूर्यास्तानंतर, अन्नाच्या स्वरुपात अनेक बदल होतात. फळांसोबतही हे घडते आणि फळांमध्ये असलेले पोषक घटक नष्ट होऊ लागतात. यामुळे पचनसंस्थेत अडथळे येण्याची शक्यता असते. याशिवाय सूर्यास्तानंतर वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे सूक्ष्मजीव आणि जीवाणू पसरू शकतात. हे जीवाणू फळांमध्ये चिकटून आपल्या शरीरात जातात. यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. म्हणून आयुर्वेदात रात्री फळे खाण्यास मनाई आहे.

कोणती वेळ सर्वोत्तम आहे

फळे खाण्याची उत्तम वेळ नाश्ता आणि दुपारचे जेवण दरम्यान मानली जाते. याशिवाय, तुम्ही ते सकाळपासून सूर्यास्तापूर्वी कधीही खाऊ शकता. बऱ्याच लोकांचे शरीर दिवसा सक्रिय राहते. अशा स्थितीत फळ सहज पचते आणि त्याचे पूर्ण फायदे मिळतात आणि पचनसंस्था मजबूत होते. पण जेव्हाही तुम्ही फळ खाल तेव्हा ते एकटेच खा. फळासोबत काहीही खाऊ नका किंवा मिसळू नका. आजकाल लोक शेक, सॅलड इत्यादी स्वरूपात फळे खातात. परंतु जेव्हा जेव्हा फळ इतर कोणत्याही गोष्टीमध्ये मिसळले जातात. त्यावेळी फळातील सर्व पोषण आपल्याला मिळत नाही.

हे देखील अत्यंत महत्वाचे

फळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पचन प्रक्रिया धीमी होते, ज्यामुळे अन्न पचन होत नाही त्यापैकी बरेच अन्न पचन तंत्रामध्येच राहते. उर्वरित अन्न चरबीमध्ये रूपांतरीत होते, ज्यामुळे रक्तातील इन्सुलिन वाढते. इन्सुलिन वाढण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका आहे, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांचा धोका आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating fruit at night is harmful to health)

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?