AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : उन्हाळ्याच्या दिवसात या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, शरिरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा…

Health Tips : पाणी हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं. काकडी, मशरूम, टरबूज, टोमॅटो, स्टॉबेरी या फळांचा समावेश करा आणि शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा...

Health Tips : उन्हाळ्याच्या दिवसात या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, शरिरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा...
DietImage Credit source: TV9
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Apr 03, 2022 | 1:30 PM
Share

मुंबई : पाणी (Water) हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं. उन्हाळ्या दिवसात शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित अत्यावश्यक बनतं. पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं. तापमान वाढलं की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. डिहायड्रेशनदेखील (Dehydration) होतं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी, साधारणपणे दररोज 8 ग्लास पाणी पिण्यासाठी सांगितलं जातं.उन्हाळ्यात शरीराची काळजी घेण्यासाठी काही फळं आणि भाज्यांचा समावेश केला तर शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहाते. ती फळं (Fruits) कोणती आहे? काकडी, मशरूम, टरबूज, टोमॅटो, स्टॉबेरी या फळांचा समावेश करा आणि शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा…

1.काकडी- उन्हाळ्यात काकडी खाल्ली जाते. त्यातील 95 टक्के फक्त पाण्याचा समावेश आहे. काकडीमध्ये पोटॅशियम असते. ते उष्माघातापासून बचाव करते. खूप कमी लोकांना माहित आहे की काकडी मेंदूचे आरोग्य देखील वाढवते. काकडीत आढळणारे फिसेटीन नावाचे दाहक-विरोधी तत्व मेंदूच्या कार्यासाठी खूप चांगले मानले जाते.

2- स्ट्रॉबेरी-  स्टॉबेरीत 91 टक्के पाणी असते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, फोलेट आणि मॅग्नेशियम आढळतात. सर्व पोषक घटक मधुमेह, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात.

3- टरबूज-  उन्हाळ्यात लोक टरबूज आवडीने खातात. टरबूजमध्ये 92 टक्के पाणी असते आणि ते उष्माघातापासूनही बचाव करते. ते शरीरात आर्जिनिन नावाचे अमिनो अॅसिड तयार करते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. टरबूज आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

4- टोमॅटो-  टोमॅटोमध्ये 94 टक्के पाणी असते.सॅलड, भाजी किंवा सँडविचमध्ये वापरले जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए देखील चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे डोळ्यांचे विकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

5- मशरूम- शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मशरूम देखील खूप फायदेशीर गोष्ट आहे. त्यात व्हिटॅमिन बी-२ आणि व्हिटॅमिन-डी सारखे पोषक घटक आढळतात. मशरूममध्ये 92 टक्के पाणी असचं.  मशरूमचे नियमित सेवन केल्याने आपला थकवा कमी होतो.

टीप- या उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या…

संबंधित बातम्या

Hair Tips : पांढऱ्या केसांवर पेरूच्या पानांचा वापर करा, काळे आणि चमकदार केस मिळवा…

Skin care : त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे रस अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!

सावधान…! मधुमेहामुळे डोळ्यांचे होऊ शकतात गंभीर विकार या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या डाॅक्टरांचे मार्गदर्शन

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली