AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय? मग आहारात समाविष्ट करा ‘या’ भाज्या

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रोगप्रतिकारक शक्ती वाढणे महत्वाचे झाले आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय? मग आहारात समाविष्ट करा 'या' भाज्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 22, 2021 | 8:56 AM
Share

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रोगप्रतिकारक शक्ती वाढणे महत्वाचे झाले आहे. त्यासाठी आहारात काही बदल करणे महत्वाचे आहे. कोरोनाच्या काळात आपण हेल्दी खाल्ले पाहिजे. पपई, भोपळा, सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांचा सूप या काळात घेतला पाहिजे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ते सुपरफूड्सपैकी एक आहे. विशेष म्हणजे पपई, भोपळा, सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांचा सूप आपण दिवसातून कधीही घेऊ शकतो. (In the diet to boost the immune system Take papaya, pumpkin, beans and greens)

आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे हे खूप महत्वाचे आहे. जर रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर केवळ कोरोनाच नव्हे तर कोणताही रोग आपल्याला स्पर्श करू शकत नाही. पपई आपल्या शरीरात व्हिटॅमिन-सीची कमतरता पूर्ण करते. शरीरात पुरेसे व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होत नाही. यासाठी दिवसामधून जसा वेळ मिळेल तसा पपईचा सूप किंवा रस घेऊ शकता.

दुधी भोपळा हा शरीरासाठी खाणे चांगला असतो. दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून तीन वेळा दुधी भोपळ्याचा रस पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दुधी भोपळ्याचा रस तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. लोह, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध आहे. रोज दुधी भोपळ्याचा रस घेतल्याने वजन कमी होते.

सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, मॉलिव्डेनम, ट्रिप्टोफॅन, मँगनीज, लोह, ओमेगा-३, फॅटी अॅसिड्स, फॉस्फरस, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व आणि काही प्रमाणात पोटॅशियम असते. सोयाबीनमध्ये स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आहारात आठवड्यातून दोन वेळातरी सोयाबीनचे सेवन केले पाहिजे. यातील आयसो फ्लेव्हन संयुगांमुळे शरीरातील चरबीच्या पेशींचे उत्पादन कमी होते म्हणजेच वजन कमी राहण्याच्या दृष्टीनं सोयाबीने उत्तम आहे.

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात. शक्यतो आहारात हिरव्या भाज्यांचे रस घ्यावा. याचा फायदा आपल्या शरीराला होतो.

संबंधित बातम्या : 

(In the diet to boost the immune system Take papaya, pumpkin, beans and greens)

Follow Us
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!