AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coconut Water Health Benefits: नारळपाणी प्याल तर स्वस्थ रहाल, उन्हाळ्यात मिळतील अनेक फायदे

उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळ पाणी शरीराला त्वरित ऊर्जा देते. यासोबतच ते रक्तातील साखरेची पातळीही वाढू देत नाही.

Coconut Water Health Benefits: नारळपाणी प्याल तर स्वस्थ रहाल,  उन्हाळ्यात मिळतील अनेक फायदे
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 25, 2023 | 12:22 PM
Share

नवी दिल्ली : उन्हाळ्यात शरीराला थंड (cool) ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करतो. नारळपाणीही त्यापैकीच एक आहे. रस्त्याच्या कडेला नारळपाण्याच्या गाड्यांवरही तुम्ही ते पिण्याचा आनंद घेतला असेल. नारळाचे पाणी (coconut water) केवळ शरीरात थंडावा आणत नाही तर ते एक उत्तम एनर्जी बूस्टर देखील आहे. यासोबतच नारळाचे पाणी सेवन करणे हे रक्तातील साखर (controls blood sugar) नियंत्रित करण्यासह किडनी स्टोकचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. नारळपाणी प्यायल्याने त्वचेत चमकही येते.

नारळाचे पाणी इलेक्ट्रोलाइट्स आणि पोषक तत्वांचा नैसर्गिक स्रोत आहे आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. ते पोषक तत्वांचे भांडार आहे. उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

नारळपाणी पिण्याचे 5 मोठे फायदे

1) ब्लड शुगर नियंत्रणात राहते मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात साखरयुक्त पदार्थांऐवजी नारळपाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. नारळपाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहून मधुमेहात आराम मिळतो. नारळाच्या पाण्यात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे जास्त प्रमाणात नारळ खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना हानी पोहोचते. म्हणूनच त्याचे सेवन ठराविक प्रमाणात प्यावे.

2) किडनी स्टोन – नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या किडनीचे आरोग्य चांगले राहते. 2018 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, ज्या लोकांना किडनी स्टोन नाही त्यांना नारळाचे पाणी सेवन करण्यास देण्यात आले. त्यानंतर त्यांनी लघवी करताना जास्त प्रमाणात सायट्रेट, पोटॅशिअम आणि क्लोराईड गमावले. यावरून असे दिसून येते की नारळाचे पाणी किडनी स्टोन (शरीरातून) बाहेर काढण्यासाठी किंवा तयार होण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

3) हृदयाचे आरोग्य – शहाळ्याचे पाणी म्हणजेच नारळ पाणी देखील हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकते. यामध्ये असलेले पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करते. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की नारळाच्या पाण्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

4) त्वचेसाठी फायदेशीर – नारळ पाणी एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच त्वचेची चमक वाढवण्यासही ते उपयुक्त आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने किंवा त्वचेवर लावल्याने मॉयश्चरायजरसारखा प्रभाव पडतो. नारळाचे पाणी नियमितपणे पिणे हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

5) स्ट्रेस, फ्री रॅडिकल्स – नारळ पाण्यात मुबलक प्रमाणात पोषक तत्वे आढळतात. पोषक तत्वांसह, त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत जे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.