AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात फिरायला जायचंय? महाराष्ट्रातील ही चार हिलस्टेशन आहेत सर्वात बेस्ट; शिमला, मनाली विसरून जाल

हिवाळ्यात वातावरण अत्यंत अल्हादायक असते. या वातावरणात कुठेतरी फिरायला जावे असे सर्वांनाच वाटते. तुम्हीही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रातील काही हिल स्टेशन तुमच्या पसंतीस उतरतील.

हिवाळ्यात फिरायला जायचंय? महाराष्ट्रातील ही चार हिलस्टेशन आहेत सर्वात बेस्ट; शिमला, मनाली विसरून जाल
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 8:32 PM
Share

हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये निसर्ग अतिशय सुंदर दिसत असतो. निश्चितपणे अनेक जण त्यांच्या कुटुंबासह कुठेतरी प्रवास करण्याचा या दिवसात विचार करत असतात. बहुतेक लोक हिवाळ्यात शिमला, मनाली आणि गुलमार्ग सारख्या ठिकाणी भेट देतात. पण तुम्हाला या ठिकाणी जायचे नसेल तर यावेळी हिवाळ्याच्या सुट्टीत तुम्ही महाराष्ट्रातील हिल स्टेशनला जाऊ शकता. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे किंवा हिल स्टेशन पाहायचे असतील तर अनेक जण पावसाळ्यात जाणे पसंत करतात. पण हिवाळ्यात या सुंदर हिल स्टेशनला भेट देण्याची मजा ही वेगळीच असते. जाणून घेऊया महाराष्ट्रातील अशी काही विलक्षण आणि सुंदर हिल स्टेशन बद्दल ज्यांना भेट देऊन तुम्हाला नक्कीच आनंद होईल.

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन बद्दल बोलायचे झाले तर सर्वात प्रथम नाव येते ते महाबळेश्वरचे. महाबळेश्वर हे पश्चिम घाटाच्या टेकड्यांमध्ये वसलेले आहे. महाबळेश्वर थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर मध्ये घनदाट जंगले, तलाव आणि समुद्रसपाटीपासून उंचीवर बसलेले अनेक पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स एक विलोभनीय दृश्य देतात. टेबल लँड, वेण्णा लेक आणि एलिफंट्स हेड पॉईंट हे येथील मुख्य आकर्षण आहे.

लोणावळा आणि खंडाळा

मुंबई आणि पुणे दरम्यान असलेली लोणावळा आणि खंडाळा ही दोन प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत. लोणावळा आणि खंडाळ्यातील पर्वतीय दृश्य, धबधबे आणि घनदाट जंगले हे जादुई अनुभव देतात. लोणावळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील समुद्रकिनारा आणि पवना तलाव आहे.

पाचगणी

महाबळेश्वर पासून जवळच वीस किलोमीटर अंतरावर असलेले पाचगणी हे अतिशय शांत आणि मनमोहक असे हिल स्टेशन आहे. पाचगणी येथे थंड हवामान, घनदाट जंगले, आणि निसर्गरम्य वातावरण हे ठिकाण खास बनवतात. पाचगणी येथील मुख्य आकर्षण वाय टेबल, 12 डोळे आणि बाबा ब्राह्मण मंदिर हे आहेत. पाचगणी येथे तुम्ही पिकनिक आणि ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता.

भीमाशंकर

भीमाशंकर मंदिर हे हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर भीमाशंकर आहे. भीमाशंकर हे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. भव्य जंगले आणि डोंगरांनी भीमाशंकरला वेढलेले आहे. हिवाळ्यात येथील तापमान इतर ठिकाणापेक्षा कमी असते. भीमाशंकरच्या जंगलामध्ये तुम्ही ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकतात जो खूप रोमांचक असतो.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला