AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारंवार हात धुतल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, तुम्ही तर ‘त्या’ गोष्टीची शिकार नाही ना?

काही लोक वारंवार हात धुतात. तर काही लोक हातच धूत नाही. हात न धुणे चूकच आहे. पण हात कितीवेळा धुतले पाहिजे यालाही काही मर्यादा आहे. हात धुण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात? किती वेळा आणि केव्हा हात धुतले पाहिजे, याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.

वारंवार हात धुतल्याने होऊ शकतो 'हा' आजार, तुम्ही तर 'त्या' गोष्टीची शिकार नाही ना?
Hand Wash
| Edited By: | Updated on: Jan 04, 2025 | 3:24 PM
Share

तुम्हाला तुमचं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर आधी शरीराची काळजी घ्या. शरीर स्वच्छ असेल तर निम्मी लढाई जिंकली जाते. तुमचं शरीर स्वच्छ तर आरोग्य स्वच्छ असं म्हटलं जातं. त्यामुळे शरीराची स्वच्छता राखणं सर्वात महत्त्वाचं आहे. आता हेच पाहा ना, काही लोक जेवणापूर्वीही हात धूत नाहीत. तर काही लोक वारंवार हात स्वच्छ करतात. दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत. ही चांगली सवय नाही. दिवसातून किती वेळा हात धुतले पाहिजे याचंही काही गणित आहे. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही काही काम करत असाल किंवा धूळ असलेल्या ठिकाणी असाल, तर तुम्हाला हात धुणे आवश्यक आहे. तसेच, बराच वेळ बाहेर राहिल्यास तुमचे हात नक्कीच मळकट होतील. अशा परिस्थितीत तुम्हाला हात धुणे आवश्यक आहे. हात धुण्याचे सोपे सूत्र म्हणजे, हातावर मळ किती दिसत आहे यावरून, किंवा तुम्ही बाहेर व्यक्तींसोबत संवाद साधल्यावर, किंवा चेहऱ्यावर हात लावल्यावर, त्याआधी हात धुणे आवश्यक आहे. तसेच, जेव्हा काही खायचे असते, तेव्हा तुमचे हात स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. नाहीतर, हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे हे उत्तम असते. कामानुसारच हात धुणे आवश्यक आहे, पण प्रत्येक वेळेस हात धुणे हे चांगले नसते.

तो मानसिक विकार

काही लोक सतत हात धूत राहतात. तुमच्या या कृतीमुळे इतरांची चिंता वाढू शकते. हे “ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर” (OCD) नावाच्या मानसिक स्थितीचे लक्षण आहे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. जे लोक वारंवार हात धुत असतात, त्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल शंका येऊ लागते. हा एक मानसिक विकार आहे. या आजाराची शिकार असलेल्या व्यक्तीला असे वाटते की, प्रत्येक मिनिटाला हात स्वच्छ ठेवले नाही तर त्यांना संसर्ग होईल.

हात वारंवार धुतल्याने होणारे नुकसान

आपल्या त्वचेच्या पहिल्या थरात लाखो फायदेशीर बॅक्टेरिया असतात. यासोबतच, या थरातून नैसर्गिक तेल बाहेर येते. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि बाह्य संसर्गापासून संरक्षण मिळते. जर आपण वारंवार हात धुतल्यास, या थराला इजा होऊ शकते आणि त्यानंतर अनेक समस्या उद्भवू शकतात. जर या थराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर सूक्ष्मजीव तुमच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात आणि संसर्ग होऊ शकतो.

दुसरे म्हणजे, जेव्हा आपण जास्त वेळा हात धुतो, तेव्हा त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. यामुळे त्वचेचा मुलायमपणा हरवतो. त्वचा फाटू शकते आणि वेदना होऊ शकतात. म्हणूनच, हात फक्त मळलेले असताना धुणे आवश्यक आहे. जास्त वेळा हात धुतल्याने हानी होऊ शकते. गरज असेल, तर सॅनिटायझरचा वापर करणे चांगले आहे.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

Follow Us
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.