AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes Test | मधुमेहाची तपासणी करताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठी गडबड!

आपल्याला मधुमेह असल्यास, शरीरातील ग्लूकोजची पातळी नियंत्रित राखण्यासाठी आपण आपल्या रक्तातील साखरेची नियमितपणे तपासणी करणे अतिशय महत्वाचे आहे.

Diabetes Test | मधुमेहाची तपासणी करताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठी गडबड!
जाणून घ्या कोरोनाव्हायरस तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम करतो?
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Feb 12, 2021 | 6:21 PM
Share

मुंबई : आपल्याला मधुमेह असल्यास, शरीरातील ग्लूकोजची पातळी नियंत्रित राखण्यासाठी आपण आपल्या रक्तातील साखरेची नियमितपणे तपासणी करणे अतिशय महत्वाचे आहे. मधुमेहासाठी जे लोक औषध घेत नाहीत, त्यांनी नियमितपणे रक्तातील साखर तपासल्यास, मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे जाते. ही तपासणी करताना याची अचूकता तुम्ही कशाप्रकारे तपासणी करता यावर अवलंबून असते (These things keep in mind while checking blood sugar).

मधुमेह तपासणीसाठी बाजारात अनेक प्रकारचे प्रगत ग्लूकोमीटर उपलब्ध आहेत. परंतु, तरीही लोकांना ते एकतर योग्यप्रकारे कसे वापरावे हे माहित नाही किंवा त्यांच्याकडून काही लहान चूक केली जाते, ज्यामुळे त्यांच्या रीडिंगमध्ये मोठा फरक पडतो. आपले डायबीटीस रीडिंग चुकीचे येऊ नये म्हणून, आपण खाली नमूद केलेल्या या 5 गोष्टींकडे लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे.

जर तहान लागली असेल…

जर आपल्याला तहान लागली असेल आणि आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर त्याचा आपल्या मधुमेह तपासणीवर परिणाम होऊ शकतो. निर्जलीकरणामुळे शरीराच्या एकूण कामकाजावर परिणाम होण्याचा धोका देखील असतो. म्हणूनच यावेळी मद्यपान टाळा आणि आपण पुरेसे पाणी प्यायले आहे, याची खात्री करा.

जेवणानंतर लगेच साखर तपासताय?

बहुतेक वेळा लोक जेवणाच्या अर्धा तास किंवा एक तासाच्या नंतर रक्तातील साखर तपासतात, ही गोष्ट बरोबर मानली जाते. जेवण किंवा न्याहारीनंतर ताबडतोब चाचणी केल्यास आपल्या साखर पातळीत नेहमीच वाढ होते. जर आपल्याला योग्य निकाल मिळवायचा असेल, तर आपण खाण्यापूर्वी तपासणी करणे चांगले. किंवा खाल्ल्यानंतर किमान दोन तास थांबा (These things keep in mind while checking blood sugar).

तपासणी करण्यापूर्वी हात धुवा

स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे देखील आपले रीडिंग चुकीचे येऊ शकते. जर आपण चाचणी घेण्यापूर्वी काही खाल्ले किंवा प्यायले असेल आणि त्यातील पदार्थ आपल्या हातावर असेल, तर तो आपल्या मधुमेह तपासणीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतो.

एकाच सुईचा वारंवार वापर टाळा

असे आढळले आहे की, बरेच रुग्ण एकाच सुईचा वापर पाच ते सहा वेळा करतात किंवा जास्त काळ सुई बदलणे टाळतात. यामुळे संसर्गाची शक्यता अनेक पटीने वाढू शकते. आपले मधुमेह रीडिंग योग्य यावे, म्हणून सुई एका वापरानंतर बदलली जावी.

चाचणी डिव्हाईसचा चुकीचा वापर

सर्वात अचूक परिणाम मिळवण्यासाठी. आपल्याला आपल्या मीटरसाठी योग्य लान्सट आणि चाचणी पट्ट्या वापरण्याची आवश्यकता आहे. आपण त्यांचा पुन्हा वापरल्यास, त्याने वाईट परिणाम दिसू शकतात. म्हणूनच प्रत्येक उपयोगानंतर त्यांना बदलण्याचा सल्ला दिला जातो. अचूक परिणाम मिळवण्यासाठी या तपासणी पट्ट्यांची एक्सपायरी तपासात राहा, कालबाह्य झाल्यास त्याचा वापर थांबवा.

(These things keep in mind while checking blood sugar)

हेही वाचा :

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली