AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या ठिकाणी पडते हाडं गोठवणारी थंडी, तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी

हिवाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण थंडीचा आनंद घेत असतो. पण आपल्या भारतात अशी काही ठिकाणं आहेत जी थंडीच्या दिवसात तेथील तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. ज्यामुळे तेथील दैनंदिन जीवन विस्कळीत होते. चला तर मग भारतात सर्वात जास्त थंडी कोणत्या ठिकाणी पडते ती ठिकाणं जाणून घेऊयात.

भारतातील या ठिकाणी पडते हाडं गोठवणारी थंडी, तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी
Cold WeatherImage Credit source: TV 9 Marathi
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Dec 19, 2025 | 11:48 PM
Share

हिवाळा ऋतू सुरू झाला की आपण थंडीचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतो. तर आपल्या भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे हिवाळ्यात तापमानात प्रचंड घट होते. अनेक ठिकाणी तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. त्यामुळे या कडाक्याच्या थंडीचा सामना तेथील नागरिकांना करावा लागतो. कारण तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्याने त्या ठिकाणची दैनंदिन कामकाज मंदावते. तर हिवाळ्यात होणाऱ्या तापमानाच्या या तीव्र घसरणीमुळे भारतातील ही ठिकाणे सर्वात थंड शहरांपैकी एक मानली जातात. चला तर मग आजच्या लेखात आपण भारतातील सर्वात थंड ठिकाणं कोणती आहेत ते जाणून घेऊयात.

मनाली

मनाली हे पहिले ठिकाण आहे जिथे हिवाळा सुरू झाला की अनेकजण मनालीला पोहचतात. हिवाळा जवळ येताच येथे जोरदार बर्फवृष्टी होते. तर या ठिकाणी रात्री तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मनाली मध्ये लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

कुलगाम

कुलगाममध्ये तापमानात सर्वाधिक घट होत असल्याची नोंद केली जाते, कुलगाममध्ये तापमान इतकं कमी होतं की लोकं रात्री घराबाहेर पडू शकत नाहीत. मात्र या तीव्र थंडीचा दैनंदिन कामकाजावर लक्षणीय परिणाम होतो.

गंगटोक

गंगटोकमध्ये हिवाळ्यात तापमानात घट होते. तथापि येथील तापमान कालांतराने बदलते. सकाळी तापमान मध्यम असते, परंतु संध्याकाळ होताच तापमानात लक्षणीय घट होते.

धर्मशाळा

धर्मशाळा हे असे ठिकाणं आहे जिथे तापमानात 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यामुळे येथील लोकांना कडाक्याच्या थंडीचा व यापासून निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रात्र झाली की तापमानात लक्षणीय घट होते. शिवाय येथे हवामान सतत बदलत असते.

बारामुल्ला

थंडीच्या दिवसात बारामुल्लामधील तापमानात लक्षणीय घट होत असते. तापमानात सतत घट झाल्यामुळे रस्ते चिकट होतात. तर जानेवारी महिना हा येथील रहिवाशांसाठी सर्वात त्रासदायक असतो.

श्रीनगर

श्रीनगरमध्ये अत्यंत थंड हवामान आहे. येथील तापमान इतके कमी होते की येथील असलेलं दाल सरोवर पूर्णपणे गोठते.

सोपोर

सोपोर हे असे ठिकाणं आहे जिथे हिवाळा महिना सुरू होतातच सर्वत्र बर्फ आणि थंड वारे वाहत असतात. ज्यामुळे लोकांना बाहेर पडणे कठीण होते.

ख्वाजा बाग

ख्वाजा बाग हे ठिकाण बारामुल्ला येथे आहे. तर या ख्वाजा बाग ठिकाणी सर्वात जास्त थंडी असते. तर या मौसमात पाण्याचे पाईप्सही गोठतात, ज्यामुळे लोकांना अनेक कामे करणे कठीण होते.

दार्जिलिंग आणि बांदीपोरा

दार्जिलिंगमध्ये विशेषतः थंडी असते, परंतु येथे अधूनमधून बर्फवृष्टी देखील होते. दरम्यान बांदीपोरामध्ये, वुलर तलाव गोठते, ज्यामुळे लोकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागतो.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं