AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमधून प्रवास करताना मृत्यू झाला तर रेल्वे प्रशासन किती देते भरपाई? नियम काय

रेल्वेतुन हजारो नागरिक प्रवास करत असतात. तर अशामध्ये समजा एखाद्य अव्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाते का? तर रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहित आहे का?

ट्रेनमधून प्रवास करताना मृत्यू झाला तर रेल्वे प्रशासन किती देते भरपाई? नियम काय
indian railway
| Edited By: | Updated on: Jan 18, 2025 | 4:25 PM
Share

भारतीय रेल्वेचे विस्तीर्ण जाळे देशभर पसरलेले आहे. देशाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये ही महत्त्वाची भूमिका बजावते. भारताच्या विकासाला गती देण्यात भारतीय रेल्वेही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अनेक जण भारतीय रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. भारतीय रेल्वे हे प्रवासाचे अतिशय सोयीस्कर साधन आहे. तर दररोज कामावर जाताना देखील असंख्य नागरिक रेल्वेने प्रवास करतात. अशातच जेव्हा लोकांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो, तेव्हा ट्रेन ही बहुतेक लोकांची पहिली पसंती असते. ट्रेनमध्ये लोकांना अनेक सुविधा देखील मिळतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने अनेक नियम प्रस्थापित केले आहेत. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांचा प्रवाशांना फायदा होतो.

ज्याप्रमाणे एखाद्या ट्रेनला ठराविक वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना परतावा दिला जातो, त्याचप्रमाणे एखाद्या प्रवाशाचे रेल्वेतून प्रवास करताना काही नुकसान झाले आणि त्याला रेल्वे जबाबदार असेल तर त्याची भरपाई देखील प्रवाशाला दिली जाते.

रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळेल का?

अनेकदा आपण ऐकतो देखील की भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये अपघात होणे. तसेच काही वेळा गाड्या रुळावरून घसरतात, अशामध्ये परिणामी अनेक प्रवाशांना त्यांचे जीव गमवावा लागतो. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे या प्रवाशांना नुकसान भरपाई देते. पण समजा एखादा सामान्य माणूस ट्रेनमधून प्रवास करताना त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला, म्हणजे आजारपणामुळे किंवा इतर काही आरोग्याच्या समस्येमुळे त्याचा मृत्यू झाला, तरीही त्याला रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळेल का?

तरच रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाते

तुमच्या देखील मनात हाच विचार येत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की लोकलमधून परावस आकारताना जर काही आरोग्याच्या समस्येने मृत्यू झाल्यास राहिलेय प्रशासनाकडून कोणतीच भरपाई मिळत नाही. जेव्हा प्रवाश्यासोबत रेल्वेकडून काही निष्काळजीपणा झाल्यास, नुकसान झाल्यास किंवा रेल्वेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडून चूक झाली तरच रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाते.

एखाद्या प्रवाशाचा नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा प्रवाशाच्या स्वतःच्या चुकीमुळे मृत्यू झाला तर त्याला रेल्वे जबाबदार नाही. अशा वेळी मृत्यू झाल्यास रेल्वेकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?