AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमधून प्रवास करताना मृत्यू झाला तर रेल्वे प्रशासन किती देते भरपाई? नियम काय

रेल्वेतुन हजारो नागरिक प्रवास करत असतात. तर अशामध्ये समजा एखाद्य अव्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाते का? तर रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहित आहे का?

ट्रेनमधून प्रवास करताना मृत्यू झाला तर रेल्वे प्रशासन किती देते भरपाई? नियम काय
indian railway
| Edited By: | Updated on: Jan 18, 2025 | 4:25 PM
Share

भारतीय रेल्वेचे विस्तीर्ण जाळे देशभर पसरलेले आहे. देशाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये ही महत्त्वाची भूमिका बजावते. भारताच्या विकासाला गती देण्यात भारतीय रेल्वेही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अनेक जण भारतीय रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. भारतीय रेल्वे हे प्रवासाचे अतिशय सोयीस्कर साधन आहे. तर दररोज कामावर जाताना देखील असंख्य नागरिक रेल्वेने प्रवास करतात. अशातच जेव्हा लोकांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो, तेव्हा ट्रेन ही बहुतेक लोकांची पहिली पसंती असते. ट्रेनमध्ये लोकांना अनेक सुविधा देखील मिळतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने अनेक नियम प्रस्थापित केले आहेत. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांचा प्रवाशांना फायदा होतो.

ज्याप्रमाणे एखाद्या ट्रेनला ठराविक वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना परतावा दिला जातो, त्याचप्रमाणे एखाद्या प्रवाशाचे रेल्वेतून प्रवास करताना काही नुकसान झाले आणि त्याला रेल्वे जबाबदार असेल तर त्याची भरपाई देखील प्रवाशाला दिली जाते.

रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळेल का?

अनेकदा आपण ऐकतो देखील की भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये अपघात होणे. तसेच काही वेळा गाड्या रुळावरून घसरतात, अशामध्ये परिणामी अनेक प्रवाशांना त्यांचे जीव गमवावा लागतो. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे या प्रवाशांना नुकसान भरपाई देते. पण समजा एखादा सामान्य माणूस ट्रेनमधून प्रवास करताना त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला, म्हणजे आजारपणामुळे किंवा इतर काही आरोग्याच्या समस्येमुळे त्याचा मृत्यू झाला, तरीही त्याला रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळेल का?

तरच रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाते

तुमच्या देखील मनात हाच विचार येत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की लोकलमधून परावस आकारताना जर काही आरोग्याच्या समस्येने मृत्यू झाल्यास राहिलेय प्रशासनाकडून कोणतीच भरपाई मिळत नाही. जेव्हा प्रवाश्यासोबत रेल्वेकडून काही निष्काळजीपणा झाल्यास, नुकसान झाल्यास किंवा रेल्वेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडून चूक झाली तरच रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जाते.

एखाद्या प्रवाशाचा नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा प्रवाशाच्या स्वतःच्या चुकीमुळे मृत्यू झाला तर त्याला रेल्वे जबाबदार नाही. अशा वेळी मृत्यू झाल्यास रेल्वेकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.