.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी की संध्याकाळी, अंघोळ कधी करावी? जाणून घ्या सर्वोत्तम वेळ कोणती?

आपल्या दैनंदिन जीवनात अंघोळीचे महत्त्व अनमोल आहे.. सकाळी आंघोळ केल्याने शरीर ताजेतवाने आणि ऊर्जा प्राप्त करते, तर संध्याकाळी आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव निघून शांत झोप मिळते. परंतू यातील नेमका कोणती पद्धत योग्य आहे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

सकाळी की संध्याकाळी, अंघोळ कधी करावी? जाणून घ्या सर्वोत्तम वेळ कोणती?
bath
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Mar 27, 2025 | 7:22 PM
Share

अंघोळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. अंघोळीमुळे केवळ शरीराची स्वच्छता राखली जात नाही, तर मनही ताजेतवाने होते. काही लोक दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी सकाळी अंघोळ करतात, तर काही जण संध्याकाळी अंघोळ करून दिवसभराचा थकवा घालवतात. पण आरोग्याच्या दृष्टीने कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे? चला तर मग, सकाळी आणि संध्याकाळी अंघोळ करण्याचे फायदे जाणून घेऊया.

सकाळी अंघोळ करण्याचे फायदे

  • शरीराला आणि मनाला ताजेतवाने करते : सकाळी अंघोळ केल्याने शरीर ऊर्जावान वाटते आणि दिवसभर उत्साही राहता येते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही सक्रिय होतात.
  • सतर्कता आणि कार्यक्षमता वाढते : सकाळी अंघोळ केल्याने मेंदूला ताजेतवाने वाटते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कामात अधिक उत्पादकता येते.
  • मूड सुधारतो आणि स्ट्रेस कमी होतो : अंघोळीमुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, ज्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होते.
  • त्वचेसाठी फायदेशीर : तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी सकाळी अंघोळ करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे त्वचेतील तेल कमी होते. तसेच मुरुमांची समस्या कमी होते आणि चेहरा तजेलदार दिसतो.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते : थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.

संध्याकाळी अंघोळ करण्याचे फायदे

  • दिवसभराचा तणाव आणि थकवा कमी होतो – संध्याकाळी अंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही शांत होतात. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास स्नायू शिथिल होतात. तणाव कमी होतो.
  • झोप चांगली लागते – झोपण्याच्या आधी अंघोळ केल्याने शरीराचे तापमान थोडे कमी होते. ज्यामुळे शरीर अधिक रिलॅक्स होते आणि झोप चांगली लागते.
  • त्वचा स्वच्छ राहते – दिवसभर बाहेर राहिल्यामुळे धूळ, घाम आणि प्रदूषण त्वचेवर जमा होते. संध्याकाळी अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते आणि त्वचा निरोगी राहते.
  • रिलॅक्सेशन आणि मानसिक शांतता – गरम पाण्याने अंघोळ केल्याने स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. शरीर हलके वाटते आणि मन शांत होते.
  • स्वच्छतेच्या दृष्टीने फायदेशीर – दिवसभर अनेक जण बाहेर फिरतात, धुळीत वावरतात, त्यामुळे संध्याकाळी अंघोळ केल्यास शरीर स्वच्छ राहते आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.

सकाळी अंघोळ करणं चांगलं की संध्याकाळी, हे पूर्णपणे वैयक्तिक पसंतीवर आणि जीवनशैलीवर अवलंबून असतं. जर दिवसभर ऊर्जावान राहायचं असेल आणि कामात सतर्कता हवी असेल, तर सकाळी आंघोळ करणं योग्य ठरेल. मात्र, दिवसभराचा थकवा घालवून शांत झोप मिळावी असे वाटत असेल, तर संध्याकाळी आंघोळ करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. काही लोक सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आंघोळ करतात, जे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते. जर तुम्ही शारीरिक मेहनतीचं काम करत असाल किंवा दिवसभर उष्णतेमध्ये बाहेर असाल, तर संध्याकाळी आंघोळ करणं चांगलं, कारण यामुळे शरीराला थंडावा मिळतो. दिवसभराचा ताण आणि थकवा दूर होतो. जर तुमचं काम डेस्कवर बसून असेल आणि सकाळी ऊर्जावान वाटायचं असेल, तर सकाळी आंघोळ करणं चांगलं ठरते.

Follow Us
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड